Uncategorized

गोदावरी कालव्यांना उन्हाळी अंतिम आवर्तन मिळणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सपादक मनिष जाधव 9823752964

आमदार आशुतोष काळेंच्या मागणीला यश

गोदावरी कालव्यांना उन्हाळी अंतिम आवर्तन मिळणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मनिष जाधव कोपरगाव – यंदाच्या तीव्र उष्णतेचा फटका फळबागा, चारा पिके व ऊस शेतीला बसू नये यासाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे अंतिम आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

छ

मंगळवार (दि.०९) पासून  गोदावरी कालव्यांना बिगर सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तना नंतर लगेचच सिंचनासाठी उन्हाळी अंतिम आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील पाण्यासाठी तहानलेल्या फळबागा, चारा पिके आणि ऊस शेतीला फायदा होणार आहे.

चालू वर्षी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लाभ क्षेत्रातील विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी खोलवर गेल्याने गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात उभ्या असलेल्या बारमाही पिकांचे भवितव्य धोक्यात आले होते. पिकांना पुरेसे पाणी देणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. गंगापूर धरणातून गोदावरी कालव्यांना मिळणारे हक्काचे ०१ टीएमसी पाणी, तसेच १.८ टीएमसी क्षमता असलेल्या गौतमी-गोदावरी जलाशयातून आणि वालदेवी धरणातूनही कालव्यांसाठी पाण्याचा एक थेंबही सोडण्यात आला नसल्याने धरण समूहात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असून सिंचनाचे आवर्तन देणे सहज शक्य असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. व उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांच्या वाढलेल्या चिंता दुर करण्यासाठी गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. अखेर त्या मागणीची दखल घेवून राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाला गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी आवर्तन सोडण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्या निर्देशानुसार गोदावरी कालव्यांना बिगर सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले असून बिगर सिंचनाचे आवर्तन पूर्ण होताच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या आवर्तनातून फळबागा, ऊस आणि चारा पिकांना प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या असून त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची वेळेत दखल घेवून आवर्तन सोडण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांचे लाभधारक शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!