हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन उपोषण करणे गुन्हा आहे का ? – आकाश नागरे
कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध
कोपरगाव प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्यातील सर्व समाजाची मागणी आहे. हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन उपोषण कऱणे चुकीचे आहे का ? असा प्रश्न काँग्रेसचे कोपरगांव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी उपस्थित करत मराठा समाजावर काठ्या चालवणाऱ्या सरकारचा जाहिर निषेध केला.
मराठी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकवर्ष अतिशय शांतीपूर्ण मार्गाने राज्यभर मोर्चे काढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन, उपोषण सुरू होते. उपोषण सोडण्यास नकार दिल्याने मराठा समाजावर जालन्याच्या अंतरवली इथे बेसुमार लाठीमार करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्या बद्दल कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध करुन लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील कोपरगांव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केली आहे.