अॅक्सिस बँकेकडून भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ५० नवीन शाखांचा शुभारंभ
ही विस्तार योजना भारताच्या वाढत्या आणि विविध प्रकारच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेची कटिबद्धता अधोरेखित करते
नागपूर, ऑगस्ट २०२६: भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वातंत्र्य सप्ताह साजरीकरणाचा भाग म्हणून अॅक्सिस बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने देशभरात ५० नवीन शाखांचे उद्घाटन केले. हा विस्तार विविध भौगोलिक प्रदेश आणि आर्थिक केंद्रांमधील ग्राहकांना सेवा देण्याच्या अॅक्सिस बँकेच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीला दर्शवतो.

भारत आपल्या विकासाच्या प्रवासात पुढे जात आहे, तसतसे अधिक आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी अधिकृत बँकिंग यंत्रणेमध्ये व्यापक सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये पसरलेल्या या नवीन शाखा बँकेच्या तंत्रज्ञान-आधारित बँकिंग व्यवस्थेला पूरक ठरत ग्राहकांपर्यंत सर्वसमावेशक बँकिंग सेवा पोहोचवतील.
पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांमध्ये पसरलेल्या या शाखा विनासायास बँकिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. एटीएम, सुलभ पायाभूत सुविधा, डोअरस्टेप बँकिंग सुविधा आणि प्रादेशिक भाषांमधील मदतीने सुसज्ज असलेल्या या शाखा ग्राहकांची सोय, समावेशकता आणि स्थानिक बाजारपेठेचे महत्त्व यावरील बँकेचे लक्ष अधिक दृढ करतात.

या प्रसंगी मत व्यक्त करत अॅक्सिस बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. मुनीश शारदा म्हणाले, “भारत सातत्याने प्रगती करत आहे, तसतसे व्यापक आर्थिक सहभाग सक्षम करण्यात आणि विविध समाजांमधील आकांक्षांना पाठबळ देण्यात बँकिंग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. स्वातंत्र्य सप्ताहात ५० शाखांचे उद्घाटन हे जिथे विकास होत आहे आणि जिथे ग्राहकांना आमची सर्वाधिक गरज आहे, तिथे उपस्थित राहण्याच्या आमच्या कटिबद्धतेला दर्शवते. तसेच, आम्ही बदलत्या ग्राहकवर्गासाठी बँकिंग अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि उपयुक्त ठरेल अशा नवीन क्षमता आणि अनुभवांमध्ये गुंतवणूक करत आहोत.”
देशभरात प्रबळ ऑन-ग्राउंड उपस्थितीसह, अॅक्सिस बँक ग्राहकांच्या जवळ राहून व्यापक स्तरावर सेवा देणे कायम ठेवत आहे. जवळपास ५४ दशलक्ष ग्राहकांना सेवा देणाऱ्या बँकेच्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये ३० जून २०२६ पर्यंत ६,२९५ शाखा आणि १२,५६४ एटीएम व कॅश रिसायकलर्सचा समावेश होता, ज्यामधील जवळपास ४८ टक्के शाखा ग्रामीण आणि अर्ध-शहरी बाजारपेठांमध्ये आहेत. या नेटवर्कला ६८५ जिल्ह्यांमधील बँकेच्या २,९३७ शाखांच्या भारत बँकिंग नेटवर्कचे पाठबळ मिळाले आहे, ज्यामुळे विविध भौगोलिक प्रदेश आणि आर्थिक घटकांमधील ग्राहकांना सेवा देणे शक्य होते.
अॅक्सिस बँक सेल्फ-सर्व्हिस, मोबाईल आणि शाखा-आधारित सोल्यूशन्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँकिंग अनुभवात सतत सुधारणा करत आहे. बँकेने एक्सप्रेस बँकिंग लॉबीज सुरू केल्या आहेत, ज्या लहान सेल्फ-सर्व्हिस डिजिटल लॉबीज आहेत. याद्वारे खाते उघडणे, झटपट कार्ड इश्यू करणे, रोख व्यवहार आणि बिल पेमेंट यांसारख्या सेवा चोवीस तास उपलब्ध होतात. या नाविन्यपूर्ण उपक्रमांना बँकेचा मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्म ‘ओपन बाय अॅक्सिस’चा पाठिंबा मिळाला आहे, ज्याचे दरमहा १६ दशलक्षांहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. तसेच, बँकेच्या ‘ब्रांच ऑफ द फ्युचर’ दृष्टिकोनाद्वारे डिजिटल सेवेला आणि ग्राहकांच्या समस्यांच्या जलद निवारणाला प्राधान्य दिले जात आहे.आपल्या ‘दिल से ओपन’ तत्त्वाने प्रेरित होऊन, अॅक्सिस बँक सर्वोत्तम क्षमतांमध्ये गुंतवणूक करत आहे, ज्या प्रत्यक्ष बँकिंगचा विश्वास आणि डिजिटल पर्यायांची सोय एकत्र आणतात, ज्यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी अधिक मोलाची सेवा निर्माण होत आहे.














