थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का. ल. शिंदे स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न-
राहाता प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये संकुलाचे संस्थापक कै.का.ल. शिंदे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व कै. का.ल. शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सुमारे 90 विद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 153 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. पी. जी. गुंजाळ होते .विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन आत्मनिर्भर झाले पाहिजे. वक्तृत्व ही एक कला आहे. त्यांनी का.ल. शिंदे पाटलांच्या स्मृतींना उजाळा दिला.
रामकृष्ण लोंढे यांनी आपल्या मनोगत मध्ये वक्तृत्व अंगी बाळगण्यासाठी वाचन गरजेचे आहे. वक्ता होण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे .वक्तृत्वाने आत्मविश्वास वाढतो असे सांगितले. डॉ. जयंत गायकवाड यांनी मनोगतामध्ये वक्तृत्व कला वाढवणे गरजेचे आहे .अनेक पुस्तके उपलब्ध आहे ,पुस्तके वाचून वक्तृत्वामध्ये पुढे जाता येते असे सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतांमध्ये भाषण ही कष्ट साध्य कला आहे. चांगला वक्ता होण्यासाठी अभिनय करता आला पाहिजे. त्यांनी विविध वक्त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवला. का.ल. शिंदे पाटलांकडे वक्तृत्व नव्हते परंतु कर्तुत्व होते असे सांगितले. संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगत मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे, स्पर्धेचा स्तर वाढलेला आहे, विद्यार्थ्यांना अपार कष्ट करून स्पर्धेला सामोरे जावे लागते या स्पर्धेत अपयश जरी आले तरी थांबायचे नाही. नेहमी यश मिळवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवावा असे सांगितले. या प्रसंगी रामनाथ सदाफळ ,सर्जेराव मते, संकुलाचे प्राचार्य व्ही एस गाडेकर, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, प्राचार्या निशा चेंगोट, उपप्राचार्य अशोक बोरसे, प्रा. शरद गमे ,समन्वयक प्रा. राजेंद्र पटारे, ज्ञानदेव गमे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रमेश आहेर यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली थोरात व कल्पना गमे यांनी केले. आभार जाधव यांनी मानले .या स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आले.