लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान
मनिष जाधव विशेष वृत्त – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
जळगाव- ६.१४ टक्के
जालना – ६.८८ टक्के
नंदुरबार – ८.४३ टक्के
शिरूर- ४.९७ टक्के
अहमदनगर- ५.१३ टक्के
औरंगाबाद – ७.५२ टक्के
बीड – ६.७२ टक्के
मावळ -५.३८ टक्के
पुणे – ६.६१ टक्के
रावेर – ७.१४ टक्के
शिर्डी -६.८३ टक्के