संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये मुलांना दर्जेदार शिक्षणासह उत्तम खेळाडू घडविण्याचे प्रशिक्षण
गावातील प्रत्येक नागरिकांनी फुल न फुलाची पाकळी देऊन शाळेसाठी मदत केली पाहिजे!
राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे – शिक्षण वाघिणीचं दूध आहे. असं म्हटलं जातं! शिक्षणाने प्रत्येक जण परिपूर्ण होत असतो. जीवनामध्ये जगण्यासाठी शिक्षणाच्या अनन्य साधारण महत्व आहे. मात्र विद्यार्थी हा एक शिक्षक घडवित असतो. त्यामुळे विद्यार्थ्याचे यशस्वी होण्यामागे शिक्षकाचा खारीचा वाटा असतो. अशाच आपण टाकळीमिया येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयाबद्दल सांगणार आहोत. संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये अनेक उत्तम खेळाडू उद्योजक व्यावसायिक अधिकारी सामाजिक नेते राजकीय नेते घडलेले आहेत. जे आज आपापल्या क्षेत्रामध्ये किंग आहेत. गुरुकुल इंग्लिश शाळांपेक्षा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम शासनाच्या शाळा करत असतात. गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुलांकडून पैशाची वेळोवेळी आकारणी करूनही सर्व विषयांच्या अध्यापणामध्ये कमी पडतात. गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये शाळेची टक्केवारी वाढविण्यासाठी मुलांना वाढीव टक्के दिली जाते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पडत असतो. याला अपवाद शासनाच्या शाळेमध्ये सर्व विषय काळजीपूर्वक तसेच जाणीवपूर्वक शिक्षकाकडून प्राधान्य पूर्वक शिकविले जाते. तरीही आज अनेक पालक शासनाच्या शाळेमध्ये मुलांना शिकविण्यासाठी कानकुस करतात. इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना फक्त आकर्षक स्कूलची निर्मिती केली जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता स्किल नाही. यासाठी पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषद तसेच शासनाच्या इतरत्र शाळेमध्ये मुलांना शिकविले पाहिजे. टाकळीमिया येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थी उपयोगी गरजांची पूर्तता होण्यासाठी अभाव असतो. कारण की डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना याला सलग्न असलेली ही संस्था कारखाना बंद असल्यामुळे शाळेच्या विकासावर परिणाम होत असतो. तरीही अनेक शिक्षक विद्यार्थ्यांची भविष्य टांगणीला न बांधता अंधातरी न करतां आपल्या स्वतःच्या खिशातून विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करत असतात. विद्यार्थ्यांसाठी कपडे फी याचीही गरज भागवत असतात. मात्र तरीही एवढे पुष्कळ नाही. यासाठी गावातील नागरिकांनी गावातील जागृत पुढाऱ्यांनी युवा नेत्यांनी शाळेसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी जास्तीत जास्त पुढे आले पाहिजे.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला सलग्न असलेले विद्यालय संत ज्ञानेश्वर विद्यालय या विद्यालयासाठी राहुरी तालुक्यातील अग्रजन्य असलेली मियासाहेब ग्रामीण शेती सहकारी पतसंस्था ही विद्यार्थ्यांना वेळोवेळी आर्थिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत करत असते. विद्यार्थ्यांपलीकडे शाळेच्या विकासाकडेही मियासाहेब पतसंस्थेचे तसेच डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मा व्हाईस चेअरमन अध्यक्ष शामराव काका निमसे यांचे विशेष लक्ष असते. वेळोवेळी शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी घरातल्या सदस्य प्रमाणे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शामराव काका यांचे विशेष लक्ष असून आर्थिक स्वरूपात काका यांचे योगदान अमूल्य आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठीही सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे तसेच गरीब होतकरू वंचित विद्यार्थ्यांना वह्या कपड्यांचे वाटप वेळोवेळी करत असतात.
शाळा अत्याधुनिक डिजिटल व्हावी विद्यार्थ्यांना नवनवीन सोयी उपलब्ध व्हाव्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे टाकळीमिया येथील प्रगतशील प्रसिद्ध उद्योजक केशव शिंदे मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात मदत करत असतात.
विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक वर्षांमध्ये काही आर्थिक अडीच अडचणी येत असताना प्रथम पालकाप्रमाणे नंतर शिक्षकाप्रमाणे चौकशी करून शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या आपआपसात वर्गणी गोळा करून विद्यार्थ्यांना विशेषतः मदत करीत असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनंतर विद्यार्थ्यांचे दुसरे आई-वडील कर्तव्य कर्तव्य पार पाडत असतात.
शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी गावातील जागृत नागरिकांनी पुढे येऊन त्यांचे भविष्य अधिकाधिक उज्वल करण्यासाठी गावातील नागरिकांनीही पुढे आले पाहिजे. तसेच खेळाडूंसाठीही पुढे येऊन वाचनालय क्रीडा किट खेळाची प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड साठी मदत केली पाहिजे – पञकार अक्षय करपे
शाळेमध्ये काही प्रकार घडल्या त्याला राजकीय रंग न देता चर्चेतून मार्ग काढून याचे निरासन केले पाहिजे प्रत्येक गोष्टीला शिक्षकाला धारेवर धरणे हे ही बरोबर नाही. शाळेतील वातावरण प्रसन्नपूर्वक ज्ञानात्मक राहिले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. शाळेमध्ये अनेक वंचित गरीब विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आपल्याला नवनवीन उपक्रम काय राबविता येईल यासाठी शाळेने व गावकऱ्यांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे.राजेंद्र करपे – भा.ज.पा. सरचिटणीस श्रीरामपूर