आपला जिल्हा

पंचायत समितीच्या अंतर्गत काम करणाऱ्या अनेक ग्रामसेवकांनी अपत्य बाबत माहिती लपवली

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

 पंचायत समितीच्या अंतर्गत काम करणाऱ्या अनेक ग्रामसेवकांनी अपत्य बाबत माहिती लपवली

श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी अपत्य बाबत गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश काढून तब्बल महिना उलटून गेला तरीही अद्यापही अनेकांनी माहिती लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सरकारने लोकसंख्या नियंत्रण मिळविण्यासाठी २८मार्च२००५ साली सरकारने कायदा केला त्यानुसार सरकारी कर्मचारी यांना तीन पेक्षा जास्त अपत्य असल्यास नोकरीस मुकावे लागेल तसेच त्या दिवसापासून आजपर्यंत नोकरीतून मिळालेल्या पगाराची वसुली होणार असा कायदा आहे त्यानुसार काही सामाजिक कार्यकर्ते यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी माहिती मागवली असता त्यामध्ये आतापर्यंत ७ प्राथमिक शिक्षण यांना तीन अथवा तिनपेक्षा जास्त अपत्य आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच ग्रामसेवक तथा ग्रामविस्तार अधिकारी यांनाही दीड महिन्यांपूर्वी माहिती मागविण्यात आली होती आज अनेक ग्रामपंचायत मध्ये तब्बल ७० ग्रामसेवक कार्यरत आहेत त्यापैकी केवळ ३० ग्रामसेवक यांनी सरकारच्या नियमानुसार अपत्या बाबत प्रतिज्ञापत्र ,बंधपत्र सादर केले आहेत म्हणजे आजपर्यंत तब्बल दीड महिन्यात केवळ ३० ग्रामसेवक यांनी माहिती सादर केली आहे म्हणजे अजूनही ४० ग्रामसेवक यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे याबाबत ४० ग्रामसेवक यांनी माहिती लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत नाहीतर एकतर त्यांना तीन अथवा तीन पेक्षा जास्त अपत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही अनेक नागरिकांचे मत आहे.

गटविकास अधिकारी यांचा आदेश यांना लागू नाही का ?
श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ राम जगताप यांनी अपत्या बाबत प्रमाणात, बंधपत्र सादर करण्याचे आदेश देऊनही दीड महिना उलटला असूनही अजूनही ४० ग्रामसेवक यांनी बंधपत्र सादर का केले नाही ,किव्हा गटविकास अधिकारी यांचा आदेश या ग्रामसेवक याना लागू होत नसावा असे अनेकांचे मत आहे
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!