निवडणूक प्रचारात रीलस्टारची महत्त्वाची भूमिका
मनिष जाधव – विशेष वृत्त
निवडणूक कोणतेही असो त्यात कार्यकर्ते हा भाग महत्त्वाचा असतो कारण प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी फार मोठी मदत होती परंतु यंदा लोकसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांची मोठी हजेरी राहील असे वातावरण असताना देखील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पाठ फिरवल्याने उमेदवार यांच्यावर एक प्रकारे मोठे संकट आल्याने शिर्डी मतदारसंघासह अनेक मतदारसंघात प्रचारात रीलस्टर ने महत्त्वाची भूमिका बजाविल्याने उमेदवार एक प्रकारे घराघरापर्यंत पोहोचले.

लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला. उमेदवारांकडून फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब चॅनेल आणि व्हॉट्सअपद्वारे प्रचार यंत्रणा राबविली गेली आहे. त्याचप्रमाणे, रील स्टारची मदत घेऊन प्रचारासाठी वेगवेगळे रील्स बनविले गेल्याने उमेदवार यांच्या बाबत मतदारांमध्ये एक चर्चेचा विषय बनत होता.

उमेदवारांकडून निवडणूक प्रचार करताना नागरिकांच्या गाठीभेटी घेणे, प्रचार दौरा, बैठका, रॅली, सभा याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियालादेखील विशेष महत्त्व दिले गेले प्रचाराची मुदत संपवुन देखील अनेक प्रकारचे रिल्स सोशल मिडियावर व्हायरल होत असुन त्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया टीम काम करत आहे. यामुळे रील्स स्टार यांना चांगले दिवस आल्याचे दिसत आहे.

रीलस्टारला मागणी यंदाच्या निवडणुकीत चांगलीच वाढली असुन यापुढे ही होणारें सर्व प्रकारच्या निवडणुकीत रील्सस्टारला महत्त्व जास्त दिले जाणार यावरून निदर्शनास येत आहे. अनेक लोकप्रिय रील्सस्टारला प्रचारासाठी रील बनविण्याचे काम राजकीय पक्षांकडून दिले जात होते. प्रचाराचे रील्स तयार करणे, ते पोस्ट करणे यासाठी रीलस्टार मानधन घेत आहेत. मीम्स तयार करणे, प्रचाराचे गाणे तयार करणे, शॉर्ट व्हिडिओ तयार करुन घेणे आदी कामे त्यांच्याकडून करुन घेतली जात आहेत.
जास्त फॉलोअर असणाऱ्यांना पसंतीएक लाखावर फॉलोअर असणारे फेसबुक, इन्स्टाग्राम पेज, यूट्यूबर यांना प्रचारासाठी पहिली पसंती मिळत आहे. त्यांची मदत घेण्याचा सपाटा प्रमुख राजकीय पक्ष, उमेदवारांनी लावला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पेज, यूट्यूबर यांचे किती फॉलोअर आहेत, याचे मूल्यमापन करुन त्यांचे मानधन ठरविले जात आहे. सोशल मीडियातून होणाऱ्या निवडणूक प्रचारामुळे व्हिडिओ एडिटर, ग्राफिक डिझाईनर, कॉपी एडिटर यांच्या हातालाही काम मिळाले आहे.
कमी खर्चात जास्त फायदालोकसभा निवडणुकीचे क्षेत्रफळ मोठे असते. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य होत नाही. त्यामुळे उमेदवार आता सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करुन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामधून आतापर्यंत केलेले काम आणि भविष्यात काय काम करणार याची माहिती दिली जात आहे. हे माध्यम कमी खर्चिक असल्यामुळे याचा लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.