बेट भागात वृक्षारोपण संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –“वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे ” या उक्तीप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्याकरिता वृक्षलागवड व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. बेट भागात नगरपालिका शाळा नं. ५, कोपरगाव च्या परिसरात नगरपालिका व वनविभाग कोपरगावच्या साहाय्याने वृक्षरोपनाचा कार्यक्रम मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे अध्यक्षतेखाली , वनपरीक्षेत्र अधिकारी – निलेश रोडे तसेच वनविभाग कर्मचारी यांचे शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास माळी यांनी केले. सुशांत घोडके यांनी आपल्या मनोगतात वृक्षाचे महत्व, काळाची गरज याबाबत मत व्यक्त केले. निलेश रोडे यांनी वृक्षावर कुऱ्हाड चालवू नये असा फतवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता याबाबत आठवण करून दिली. रस्त्याच्या दूतर्फा वृक्षांची आवश्यकता तसेंच वनविभागाचे कार्य व वनक्षेत्राबाबत माहिती दिली. सुहास जगताप यांनी शाळेच्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे कौतुक केले.
जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करून झाडांची घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे आवश्यकता व्यक्त केली. आयुर्वेदिक वनस्पतीबाबत त्यांनी महत्व विषद केले. कार्यक्रमास बाळासाहेब आव्हाड – अध्यक्ष दैत्यगुरु शुक्राचार्य देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, पूनम गगे -शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अमित पराई -वरिष्ठ लिपिक, प्रशांत शिंदे -गट समन्वयक, सुनीता यादव -वन परिमंडळ अधिकारी, मुस्ताक सय्यद व निर्मला शिंदे -वनरक्षक,लिलावती जमधडे, विनोद नाईकवाडे, बाबासाहेब आव्हाड, रामभाऊ कदम, वैभव जमधडे, विशाल आव्हाड,वर्षा वाघमारे, भाऊसाहेब शिंदे, अर्चना वाघमारे, अशोक मतकर, प्रकाश साळुंके, सुनिल साळुंके पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते लिंब, चिंच, आंबा, वड, करंज, भेंडी, इत्यादी ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात, मनोजकुमार पापडीवाल -उप मुख्याधिकारी व ज्ञानेश्वर चाकणे -नगरपालिका अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचलन शिक्षक सुनिल रहाणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी सुनील रहाणे अमोल कडू व नसरीन पठाण यांनी परिश्रम घेतले.