आपला जिल्हा

संजीवनी अकॅडमीची अनुष्का उंडे सीबीएसई परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवुन तालुक्यात सर्व प्रथम

मनिष जाधव 9823752964

संजीवनी अकॅडमीची अनुष्का उंडे सीबीएसई परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवुन तालुक्यात सर्व प्रथम
              
 इ. १० वीत ३० विद्यार्थ्यांना ९० टक्के व ६० विद्यार्थ्यांना ८० टक्यांपेक्षा अधिक गुण

कोपरगांव प्रतिनिधी मनिष जाधव – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनॅशनने (सीबीएसई-केंद्रिय माध्यमिक शिक्षण  मंडळ) फेब्रुवारी-मार्च, २०२४ मध्ये घेतलेल्या इ. १० वीच्या परीक्षांचे निकाल  जाहिर केले असुन यात संजीवनी अकॅडमीच्या अनुष्का सचिन उंडे हिने ९९ टक्के गुण मिळवुन कोपरगांव तालुक्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. तसेच तिने संस्कृत व समाजशास्त्र  या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले. या परीक्षेत ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक तर ६० विद्यार्थ्यांनी ८० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन एक विक्रम प्रस्थापित केला, अशी  माहिती संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निकाल
Bank
पत्रकात पुढे म्हटले आहे की चार्वी रमेश  कोठारी हीने ९८ टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला. आरती अनिल कारवा हीने ९७ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या  क्रमांकाची मानकरी ठरली. वरूण समिर डहाके व शांभवी  अनिल देशपांडे यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवुन चौथा क्रमांक मिळविला. परीमल दत्तात्रय आदिक, कृतिका मयुर पटेल आणि शरीन सिराज जलिश  अहमद यांनी प्रत्येकी ९५ टक्के गुण मिळवुन पाचवा क्रमांक मिळविला. श्रावणी आण्णासाहेब थोरात हीने मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवुन नवा कीर्तिमान प्रस्थापित केला.
Adds विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, प्राचार्या शैला  झुंजारराव व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.
चौकटः
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांनी दर्जा व गुणवत्तेशी  कधीही तडजोड करायची नाही, अशी शिकवण  दिली. त्यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक  तत्वांनुसार शाळेची वाटचाल सुरू आहे. म्हणुनच संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थी देश  पातळीवर विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकुण आणतात. आपले विद्यार्थी बहुआयामी घडावेत, या दृष्टीने  स्कूलचे प्रयत्न असतात आणि त्याला यशही मिळत आहे. सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करून स्कूलच्या दर्जाची उंची वाढविली आहे. या परीक्षेतील उत्तुंग यश  हे आम्ही स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या पवित्र स्मृतिस समर्पित करीत आहोत. – 
Kolhe
डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स     
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!