आपला जिल्हा

विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने पुन्हा एकदा घेतला तीन तरुणांचा बळी

मनिष जाधव 9823752964

विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाने पुन्हा एकदा घेतला तीन तरुणांचा बळी

श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे  :- मागील वर्षी गळीत हंगाम सुरू असताना हॉटेल अन्यण्या जवळ उसाच्या गाडीला धकडून तीन जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा  श्रीगोंदा तालुक्यातील  काष्टी येथील गावातील तीन तरुणांचा काल दि.१३ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील  दौंड- पाटस रस्त्यावर गिरिम गावाजवळ (वायरलेस फाट्यानजीक) उसाच्या ट्रॅकटरला मोटारसायकलची धडक होवून झालेल्या अपघातात तिघा तरूणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
तीन तरुणांचा बळी
तीन तरुणांचा बळी
मागील वर्षी गळीत हंगाम चालू असताना हॉटेल अन्यण्या जवळ तीन जण धडकून ठार झाल्याची घटना घडली होती पुन्हा या वर्षी चालू गळीत हंगाम चालू असताना पुन्हा तीन जण उसाच्या ट्रॅक्टर ला धडकून जागीच ठार झाले आहेत यामध्ये ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४),गणेश बापु शिंदे (वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून आज संपूर्ण  गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी  घेतला आहे. मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून आपल्या घराकडे येत असताना उजव्या बाजुने समोरच्या वाहनाची प्रखर लाईट डोळ्यावर आल्यानंतर डाव्या बाजुने पुढे समोर विना रिफ्लेक्टर चाललेल्या  उसाच्या ट्रॅकट अंधारात दिसला नसल्यामुळे  एम,एच.१६ बी.पी.९२८० मोटारसायकल पुढे चाललेल्या ट्रॕक्टरला  धडकली आणि यामध्ये  स्वप्निल,ऋषीकेश,व गणेश या तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. दौंड आणि श्रीगोंदा पोलिस यांची गांभीर्याने दखल घेतात हे आता पहाव लागेल.
आतापर्यंत रिफ्लेक्टर चे ६ बळी ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असताना ट्रॅक्टर ट्रक बैलगाडीतून ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने रिफ्लेक्टर लावत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आतापर्यंत रिफ्लेक्टर चे ६बळी गेले आहेत अजून किती बळी जाण्याची प्रशासन वाट पाहतेय असे नागरिकांतून बोलले जात आहे,
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!