विकसित भारत संकल्प यात्रेच. बहादराबाद मध्ये जल्लोषात स्वागत
कोपरगाव मनिष जाधव – केंद्र सरकारच्या लोकोपयोगी विविध योजनांची माहिती देण्यासाठी तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रा” संपूर्ण राज्यभर सुरु आहे.सदर योजनेचा रथ बहादराबाद येथे आला असता बहादराबादच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ अश्विनी पाचोरे यांनी रथाचे पुजन करुन स्वागत केले.यावेळी जि प प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत,स्वच्छ भारत मिशन,पी एम फसल बीमा योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी,उज्वला गॅस योजना,जनधन योजना,पी एम आवास योजना अशा केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांचे माहितीदर्शक फलक हाताशी धरुन,टाळांच्या गजरात या विकासदिंडीत घेतलेला सहभाग लक्षवेधी ठरत होता.
सदर रथासोबत गावात विकासदिंडी काढण्यात आली.या फेरी नंतर केंद्र सरकारने राबविलेल्या विविध लोकाभिमुख योजनांची चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली.यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या लाभासंदर्भात समाधान व्यक्त करत केंद्र सरकारचे आभार मानले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी आपल्या मनोगतातून केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या पारदर्शी कारभाराची माहिती दिली.कार्यक्रम समारोपावेळी उपस्थितांना देशाच्या अखंडतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामसेविका श्रीम अनिता दिवे,मुख्याध्यापक श्रीम स्वाती गुळवे,सहशिक्षक श्री सचिन तारडे,सोनाली नेहे,रुपाली पाचोरे,प्रविण घारे, अशोक सरवार यांनी परिश्रम घेतले.
यावेळी वि का सोसायटीचे चेअरमन साहेबराव पाचोरे,पोलिस पाटील आप्पासाहेब पाचोरे,सरपंच अश्विनी पाचोरे,सदस्य गिताराम पाचोरे,कल्याणी पाचोरे,दिपाली जोंधळे, मा चेअरमन दत्तुआप्पा पाचोरे,आण्णासाहेब पाचोरे, काकासाहेब पाचोरे,बाजीराव पाचोरे,दत्तात्रय पाचोरे,उल्हास पाचोरे,पंकज जोंधळे,सुभाष पाचोरे,गोवर्धन पाचोरे,हिरामण माळी,खंडू माळी,सावळेराम आहेर,राजू सरवार यांसह ग्रामस्थ व उमेद अंतर्गत बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*