राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्जासाठी जामीनदाराची अट रद्द करा – सचिन कोळपे
कोळपेवाडी – कोपरगांव येथील माजी सरपंच सचिन नामदेव कोळपे यांची केंद्र शासनाकडून अपेक्षा.सध्या सर्वच वित्तीय संस्थांमध्ये मार्च एंड ची धावपळ सुरू आहे.नविन पिक कर्ज घेतांना सहकारी सोसायट्या मध्ये कुठल्याही जामिनदाराची आवश्यकता नाही मात्र राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नविन पिक कर्ज घेतांना नियमित दोन कर्जदारांची जामीनदार म्हणुन आवश्यकता भासते तसेच सहकारी सोसायट्यांचे डीक्लेरेशन करतांना शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क देखील लागत नाही मात्र राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज घेतांना मुद्रांक शुल्क देखील भरावे लागते.

सध्या कर्जमाफीच्या प्रतिक्षेमुळे थकित कर्जदारांची संख्या अधिक आहे जर लाखो रूपयांच्या शेतजमिनीवर बोजा निर्माण होणार असेल तर जामीनदारांची गरज काय हा साधा आणि सरळ विषय आहे.ही शेतकऱ्यांसाठी जाचक असणारी अट रद्द करावी अशी मागणी कोळपे यांनी केली आहे.