
केलवड, पिंपरी, गोगलगाव,पिंपळस, दहेगाव, मध्ये पाहणी
शिर्डी /राहता,(प्रतिनिधी)- काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये अवकाळी व गारपिटीने नुकसानग्रस्त झालेल्या फळबागा व पिकांची पाहणी केली असून या अवकाळी पावसाने फळबागांसह पिकांची मोठे नुकसान झाले असल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अशी आग्रही मागणी मा. महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे
राहता तालुक्यातील गोगलगाव, पिंपळस, दहेगाव, केलवड ,निर्मळ पिंपरी या गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या फळबागा व पिकांची पाहणी आमदार थोरात यांनी केली यावेळी समवेत शिर्डी विधानसभा काँग्रेस नेते सुरेश थोरात, राहता तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड.पंकज लोंढे,डॉ. एकनाथ गोंदकर, नितीन सदाफळ, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, मच्छिंद्र गुंजाळ, निलेश डांगे, संजय जेजुरकर, सचिन चौगुले, संदिप कोकाटे, बबन नळे, उत्तमराव मते ,गणेश चोळके,जाकीर शेख, शिवप्रसाद आहेर, बाळासाहेब निरगुडे, विनायक निरगुडे, आण्णासाहेब निरगुडे, विनायक दंडवते, सुधाकर दंडवते, समीर करमासे ,विशाल डांगे, अशोक ठाकरे, आबासाहेब आभाळे, सोमनाथ जेजुरकर, आबासाहेब आभाळे, बाबासाहेब चव्हाण, आण्णासाहेब वाघे, विशाल वाघमारे, सागर वाघमारे, लाला बनसोडे, सतिश डांगे, सुभाष निर्मळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी राहता तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फळबागा व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यातील शेतकरी हा मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. फळबागा, भाजीपाला सह सर्व पिकांसाठी खते, बी बियाणे यासाठी शेतकऱ्याला मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. लहान मुलांसारखी पिकांची जोपासण करावी लागते. त्यातच अशा अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कंबरडे मोडले जाते .
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना वेळेवर मोठी मदत झाली असून सहजतेने मदत उपलब्ध झालेली आहे. या सरकारनेही घोषणा न करता शेतकऱ्यांना जे नुकसान झाले आहे. त्याकरता भरीव मदत केली पाहिजे.
झालेले नुकसान याचबरोबर बँकेचे जे कर्ज आहे ते भरता येईल एवढी तरी भरीव मदत झाली पाहिजे. जेणेकरून नुकसानग्रस्त पीक काढून नवीन पीक उभे करता येईल. अशी भरी मदत करावी अशी मागणी ही आमदार थोरात यांनी यावेळी केली.
यावेळी राहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा व झालेल्या नुकसानीबाबत आमदार थोरात यांच्या पुढे समस्या मांडल्या.. या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा असेही आमदार थोरात यांनी सांगितले आहे.