आशिष शेलार यांच्यावर मोठी जबाबदारी
मुंबई प्रतिनिधी – निवडणुक वातावरणाची तयारी सध्या सर्वच राजकीय पक्षाकडुन सुरु झाली असुन पदाधिकारी मध्ये देखील अनेक बदल पाहावयास मिळत आहेत तर दुसरीकडे भाजपने बाजार समिती, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत , जिल्हा परिषद, लोकसभासह इतर सर्वच निवडणुकांवर विशेष लक्ष घातले आहे. महापालिका निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात देखील चांगलीच रंगली असुन जो तो पक्षाकडुन आलेल्या नियोजन प्रमाणे काम करत आहे.
त्यातच भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर भाजपने गुजरात निवडणुकीत दहा विधानसभा जागेची जबाबदारी दिल्याची माहिती समोर येत आहे परंतु मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी कोणावर ? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधुन उपस्थितीत होत आहे. मागील गुजरात निवडणुकीत आशिष शेलार आणि त्यांच्या टीमने सूरतमध्ये चांगली कामगिरी केली केली होती. त्यामुळे यंदाही शेलार आणि त्यांच्या टीमवर्कवर केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला आहे. मुंबईची जबाबदारी देखील शेलार यांच्यावरच राहणार असल्याचे बोलले जात आहे.