अखेर रस्त्याचा प्रश्न सुटला!
श्रीगोंदा प्रतिनिधी – श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे ते मांजरकडा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता लोकनेते गटनेते सतीश आण्णा धावडे यांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून मुरमीकरण करून लोकार्पण करण्यात आले, सांगळेवाडी, खामकर वाडी क्र.१खामकर वाडी क्र.२ पवारवस्ती तसेच धावडेवाडी जवळपास आर्ध्या गावाचा प्रश्न यातून सुखकर झाला आहे.

बऱ्याच दिवसापासून ह्या रस्त्याची दुरावस्था चिखल आणि काट्यांनी फार बिकट झाली होती, शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असत, सर्व ग्रामस्थांना दळण वळनासाठी महत्वाचा मानला जाणारा पिपर वाट या नावाने संभोदल्या जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. उदघाटनप्रसंगी प्रसंगी बोलताना सतिश आण्णानी सांगितले गावातील राहिलेले रस्ते पण दुरुस्त करण्याचे काम आपण अशाच पद्धतीने करू असे आश्वासन दिले.
प्रसंगी शिरुरचे नगराध्यक्ष दादाभाऊ वाखारे, येळपणे गावचे विद्यमान सरपंच किरणभाऊ धावडे , सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सांगळे मेजर , नवनाथ खामकर मेजर, पाणी वाटप संवस्थेचे चेअरमन गणेश डफळ. येळपणे सोसायटीचे तज्ञ संचालक विजुभाऊ धावडे युवा नेते गणेश थोरात, प्रशांत पवार, जालिंदर धावडे, प्रविण धावडे भास्कर सांगळे राजू धावडे संपत सांगळे प्रविण सांगळे शशिकांत राजेधावडे सतिष ह धावडे इत्यादी येळपणे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.