आपला जिल्हा

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

संपादक मनिष जाधव 9823752964

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव प्रतिनिधी – ज्याप्रमाणे दरवर्षी कोपरगाव शहर व तालुक्यातील छोट्या उद्योगांना वाव देण्यासाठी बिझनेस एक्सपो भरवला जातो , त्याचप्रमाणे जे कोपरगाव शहर व तालुक्यात जे शिकलेले बेरोजगार तरुण व तरुणीं आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती मेळावा, जॉब एक्सपो कोपरगाव शहरात होणे गरजेचे आहे. खूप मोठ्या प्रमाणात युवक व युवती नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे , वाट बघत आहे. यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सामाजिक संघटनांनी दर दोन वर्षाला सर्वांनी एकत्र येऊन बिजनेस एक्सपो प्रमाणे नोकर भरती मेळावा , जॉब एक्सपो करावा .जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल , नोकरी मिळेल.

ऊ

यासाठी प्राथमिक स्वरूपात आपल्या जवळच असलेल्या संभाजीनगर ( औरंगाबाद) , अहिल्यानगर ( नगर ) , नासिक , पुणे या भागातील कंपन्यांशी संपर्क साधून व कोपरगाव तालुक्यातील बाहेरगावी शिकून गेलेले ज्यांच्या मोठमोठ्या कंपन्या पण आहेत व मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत असणारे अधिकारी यांच्याशीही संपर्क साधून , त्यांनाही यात सामील करून तालुक्यातील इतर तरुणांना कसं रोजगार देता येईल नोकरीला लावता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

ऐ
दहावी, बारावी , बीकॉम , बीए बीएससी , ग्रॅज्युएट ,कुठल्याही क्षेत्रातील इंजिनियर , नरसिंग , बीबीए , एमबीए , छोटे कोर्सेस असे वेगवेगळे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तालुक्यातील युवकांसाठी व युवतींसाठी , सर्वांनी जर एकत्र येऊन निस्वार्थीपणे आपल्या तालुक्यातील युवकांसाठी रोजगार मिळण्यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे या युवकांना व त्यांच्या कुटुंबांना या माध्यमातून मोठा हातभार लागेल व एक मोठा आदर्श या युवकांपुढे आपल्या गावातील पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी उभा राहील.
तसेच भविष्यात कोपरगाव व शिर्डी मध्ये सावळीवीहीर मध्ये मोठी MIDC घोषित झाली आहे व समृद्धी महामार्गाला खेटून कोपरगाव तालुक्यात स्मार्ट सिटी चे नियोजन सरकारचे आहे. यामध्ये मोठ मोठ्या कंपन्या येणार आहेत सुरू होणार आहेत असे कळते. याचे काम होईपर्यंत दोन-तीन वर्षात हे युवक अनुभव घेऊन पुन्हा आपल्या तालुक्यातील असणाऱ्या कंपन्यांमध्ये जास्त पगारावर येऊ शकतात व आपल्याच तालुक्यात राहून त्यांचा खर्चही कमी होऊ शकतो व रिटायर्ड सिटी हे नाव पुसले जाण्यासाठी हे युवक आपल्या कुटुंबासोबत येऊन राहू शकतात . असं दुहेरी फायदा या तरुणांना , गावाला व त्यांच्या कुटुंबाला होईल. तसेच भविष्यात शिर्डी किंवा कोपरगाव ही जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय होणार असणारे निश्चितपणे इथे व्यापार चांगला वाढणार आहे .यासाठी आत्ताच जर एकत्र आलो आणि हा मेळावा घेतला तर निश्चितपणे आपल्या तालुक्यासाठी ही खूप मोठं काम असेल. आपलं तालुक्यातील मुला-मुलींमध्ये खूप चांगले काम करण्याचे स्किल आहे. परंतु ओळख , माहिती व वशिला नसल्याने नोकरी मिळणे , काम मिळवणे अवघड झाली आहे . तसेच जे नोकरी करून बाहेर अनुभवी होतील ते तालुक्यातील इतर तरुणांना छोटी छोटी उद्योग व्यवसाय कशे उभारावे व कोणते उभारायचे याची माहिती देऊ शकतील, जेणेकरून छोटी छोटी उद्योगही आपल्या तालुक्यात उभे राहतील व यामुळे चलनवाढीसाठी व व्यापार वाढीसाठी तालुक्याला प्रत्येक कुटुंबाला त्याचा उपयोग होईल. हयासाठी माझे संपूर्णपणे योगदान या रोजगार मेळाव्यासाठी राहील.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!