खोदून ठेवलेल्या साईड पट्ट्याचे काम तातडीने पूर्ण करा – जनार्दन कदम
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील सुरवसे घर ते भडकवाडे घर या परिसरातील रस्त्याच्या साईड पट्ट्याच्या कामासाठी बरेच दिवसापासून खोदून ठेवलेले असुन अद्याप कामाला सुरुवात झालेली नसुन पालिकेने त्वरीत लक्ष घालून पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना लेखी पञाव्दारे केली आहे.
सुभद्रानगर भागातील रस्त्याच्या साईड पट्ट्या करण्यासाठी बांधकाम कॉन्ट्रॅक्टर धोत्रे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून त्या रस्त्याच्या कड खोदून ठेवलेल्या आहेत यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सदर कॉन्ट्रॅक्टरला योग्य ती समज देत आपण या कामात लक्ष घालून या खोदलेल्या साईड पट्ट्यामध्ये पेव्हर ब्लॉक बसवून देत या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखीपञाव्दारे मागणी केली. येणाऱ्या दोन दिवसात सदर रस्त्याच्या साईड पट्ट्यांचा कामास सुरुवात होईल असे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने आश्वासन देण्यात आले. दिलेल्या आश्वासनावर माजी नगरसेवक कदम व स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले. यावेळी सतीश जाधव, सुशांत भोंगळे, शेखर भडकवाडे, संजय सुरवसे, नानासाहेब गव्हाळे, भास्कर जोंधळे, ओमप्रकाश जोशी, चंद्रकांत कादबने, रणदिवे सर, कुसुम ढाके, जोशी ताई यांच्यासह आदि स्थानिक नागरिकांच्या लेखी पञावर सह्या आहेत.