Uncategorized

सभासदांचा विश्वास संपादन करणारी समता – निवृत्ती बगाटे, जेष्ठ सभासद

संपादक मनिष जाधव 9823752964

सभासदांचा विश्वास संपादन करणारी समता – निवृत्ती बगाटे, जेष्ठ सभासद

कोपरगाव मनिष जाधव – समता पतसंस्थेने आमच्या ठेवींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुरक्षितता प्राप्त करून दिली आहे. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत संस्थेच्या ९९.७१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी २७ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित केल्या आहेत. सुरक्षितता ही आम्हाला इतर कोणत्याही बँकेत न मिळणारी सुविधा आहे. समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे व संचालक मंडळ आम्हा सभासदांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना उपक्रम राबवतात. त्या योजनांचा आम्हाला पूर्णपणे होत आलेला आहे. समताचे अजून एक वेगळेपण म्हणजे ही संस्था राजकारण विरहित व सभासद , ठेवीदारांचा विश्वास संपादन करणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार संस्थेचे जेष्ठ सभासद निवृत्ती बारकू बगाटे यांनी काढले.

अ
समता दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे सभासद निवृत्ती बारकू बगाटे, सुरेश जपे, बाळासाहेब जंगम, निवृत्ती एकनाथ नरोडे, सुरेंद्र व्यास, वैभव गिरमे आदींच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्था ही सभासदांच्या शहरी व ग्रामीण भागातील घराघरात जाऊन पोहोचली आहे. १५ वर्षापासून प्रत्येक वर्षी ५० हजार दिनदर्शिका तयार करण्याचे नियोजन समता करत असते. हि दिनदर्शिका सभासदाच्या घरात व कार्यालयात लावण्यासाठी आमचे कर्मचारी त्यांना देत असतात. या दिनदर्शिकेमुळे दैनंदिन, साप्ताहिक मासिक, वार्षिक कामकाजाचे नियोजन व समताच्या प्रत्येक योजना व उपक्रमाची माहिती त्यांना होत असते.असा दुहेरी फायदा सभासदाला होत असतो.

आ
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आमच्या ठेवींना सुरक्षितता प्राप्त झाली आहे. तसेच संस्थेशी करत असलेल्या व्यवहारात आम्हाला पारदर्शकतेचा अनुभव आला आहे. ठेवींवर मिळणाऱ्या व्याजामुळेही आम्हाला अनेक वेग वेगळे आर्थिक फायदे होत असल्याचे ठेवीदार सुरेश जपे यांनी सांगत संस्थेच्या पुढील आर्थिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. सभासद, ठेवीदारांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे व ज्येष्ठ संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी संस्थेचे बोर्ड सेक्रेटरी संतोष मुदबखे, एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके, फंड विभाग प्रमुख जितेंद्र अमृतकर, निलेश देशमाने, ईडीपी विभाग प्रमुख योगेश आसने, कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे, तसेच मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख संजय पारखे यांनी केले. उपस्थितांचे आभार संचालक अरविंदजी पटेल यांनी मानले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!