सन १९९६ च्या दहावीच्या मुलांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ; २८ वर्षानंतर सवंगडी आले पुन्हा एकत्र
बालाजी देडगाव (वार्ताहर)- मुळा एज्युकेशनच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देडगाव (जुने न्यु इंग्लिश स्कूल देडगाव) सन १९९६ च्या बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.हे विद्यार्थी तब्बल २८ वर्षानंतर एकत्र आले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.हयात नसलेले सवंगडी व शिक्षक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.सर्व शिक्षकांचा फेटा बांधून गौरवपत्र व बुके देवून सर्व विद्यार्थाच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सर्व मुलांनी आपला अल्प परिचय देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप तांबे यांनी केले तर नवनाथ फुलारी व रवी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तथा जेष्ठ शिक्षक मुरलीधर दहातोंडे हे होते.व्यासपीठावर प्राचार्य स्वरुपचंद गायकवाड,शरद कराळे,सर्जेराव चामुटे,विलास फिसके,गणपत शेंडे,वसंत वाहुरवाघ,संजय ब-हाटे,पांडुरंग सोनवणे,बिरू पेटे,निवृत्ती गायकवाड,सोमनाथ फुलारी यांच्यासह प्रभाकर पवार,बाळासाहेब काळे,संतोष कर्जुले,विकास सोनवणे,अशोक राजगुरू,चंद्रकांत धाडगे,संभाजी रक्ताटे उपस्थित होते.शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.मार्गदर्शन करतांनी स्वरुपचंद गायकवाड म्हणाले, प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करा.मुलांना उच्च शिक्षण द्या.अध्यक्ष मुरलीधर दहातोंडे यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्याचा उपयोग समाजासाठी करा.आई-वडिलांची सेवा करा,व्यसनापासून दूर रहा असा सल्ला दिला.प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात चांगले नाव मिळवल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थी मनोगतामध्ये गोखले इन्स्टिट्यूट येथे कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ.दिलीप काजळे,युवा उद्योजक रेकत पठाण,महेंद्र हिवाळे,विष्णू पंडित,पोपट मुंगसे,पै.रंगनाथ कोकरे,जिजामाता भेंड्याचे प्रा.महादेव बनसोडे,इंदोर येथे कार्यरत असलेले संदिप कोल्हे,आदर्श युवा शेतकरी राजेंद्र तांबे,राऊसाहेब मुंगसे,लक्ष्मण साबळे,भागचंद मुंगसे,अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलच्या परिचारिका संगिता चौधरी,नेवासा येथील राजेंद्र पंडित,डॉ.अनिल होंडे यांची मनोगत लक्षवेधी ठरले.बथूवेल हिवाळे,राहुल पालवे,शाहीर कचरू शिरसाठ, संदिप नांगरे यांनी गीतगायन केले.अंबादास मुंगसे यांनी अभार मानले.स्नेह भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.कार्यक्रमासाठी पाचुंदा येथील होंडे, भिसे, तेलकुडगाव येथील काळे, गायकवाड,शहापूर येथील कोलते, देडगाव येथील मुंगसे, तांबे, तिडके, कुटे,चेडे, पुंड, मोरे, अंधारे, घोडके आदी विद्यार्थी देखील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व मुलांनी कष्ट घेतले.