आपला जिल्हा

श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी , उद्घाटन पत्रिकेत बाळासाहेब नाहटा यांचे नाव नाही

मनिष जाधव 9823752964

श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी समोर ,महेश्वर मल्टीस्टेट च्या उद्घाटन पत्रिकेत बाळासाहेब नाहटा यांचे नाव नाही

श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात कोळाईदेवी महाविद्यालय तसेच महेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार हे येत असून या निमित्ताने श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी समोर आली आहे कारण महेश्वर मल्टीस्टेटच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महाराष्ट्र राज्य बाजार समितीत महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांचे नाव नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गटबाजी समोर आली आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही

मागील काही दिवसापूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब नाहटा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे मात्र उद्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कोळाईदेवी महाविद्यालय हे नागरिकांनी लोकवर्गणीतून बांधले असून याचा लोकार्पण सोहळा देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार असून तसेच महेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड चा उद्घाटन सोहळा ही त्यांच्याच हस्ते पार पडणार असून या निमंत्रण पत्रिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील गटबाजी समोर आली आहे या निमंत्रण पत्रिकेमध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे महासंघ सभापती श्री बाळासाहेब बन्सीलाल नाहटाचे नाव नसल्यामुळे श्रीगोंदा गटबाजी व अंतर्गत चालेली धूसपुस या निमित्ताने समोर आली आहे या अंतर्गत गट बाजीचा फटका पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये बसू शकतो त्यामुळे या अंतर्गत गटबाजीला शह देण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे या गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते याचीही जाण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्याही कार्यक्रमात अंतर्गत गटबाजी होत असेल तर यामध्ये पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे याकडे तालुक्यातील नेत्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र ही गटबाजी कुठेतरी थांबवून पक्ष बांधणीकडे सर्वांनी एकजुटीने लक्ष दिल्यास याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही असेही काही तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे त्यामुळे ही गटबाजी थांबणार का असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!