‘श्रीगोंद्यात तणाव..’ खासदारासमोरच राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे : अहमदनगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील रेल्वे गेट परिसरातील तीन किलोमीटर अंतराचे काम रखडले आहे. त्यामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य आढळते तसेच यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे त्यामुळे हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक जण आग्रही होते त्यावर पाठपुरावा करून आज त्या कामाचा शुभारंभ अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते उद्घाटन संभारभ ठेवण्यात आला होता त्यात एका अपशब्द वरून वादंग निर्माण झाले होते पण अनेक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले.
अहमदनगर – दौंड रोडवर लोणी व्यंकनाथ परिसरात 3 किमी अंतराचे काम बरेच दिवस रखडले होते यासाठी खासदार सुजय विखे प्रयत्न करून या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. त्या कामाचा प्रारंभ विखेपाटलांच्या हस्ते करण्यात आला. आमदार बबनराव पाचपुते, गणपतराव काकडे, भगवानराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्यामुळे येथ काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी हस्तक्षेप करुन वाद मिटवला. ‘सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद निवडणूका होवू द्या सगळे ठिक होईल,’ असे सूचक वक्तव्य विखे यांनी यावेळी केले.”विकासाचा प्रश्न आहे.कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा कार्यकर्त्यांना संधी मिळते.सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत यापुर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर सगळे म्यूट म्हणजे मूक दिसले असते थोड्या दिवस थांबा श्रीगोंद्यातही तेच दिसणार आहे,” असे विखे म्हणाले.मात्र झालेल्या भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर त्यांनी बोलण्याचे टाळत निवडणुका वर लक्ष केंद्रित केले होते असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही
नेमका काय प्रकार झाला..या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते व राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी विखे यांचे कौतुक केले. त्यांच्याकामाबाबत त्यांनी अभिनंदन केले. अॅड. काकडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले. त्यानंतर पुन्हा नाहाटा यांनी माईक हातात घेतला आणि काकडे यांच्यावर शाब्दिक वार सुरु केले. त्याचवेळी काकडे उठून उभे राहिले आणि दोन्ही नेत्यांमध्ये तुफान शाब्दीक युद्ध झाले. खासदार विखे यांच्यासह अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला आहे हे वातावरण शांत झाले पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का ? हे मात्र समजू शकले नाही
निवडणुका जवळ आल्या की वाद पण निवडणुकीत चारी मुंड्या चित ?कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की लोणी व्यंकनाथ या ठिकाणी अल्पसंख्याक लोकांना सॉफ्ट टार्गेट केले जाते मात्र हीच अल्पसंख्याक लोक एक होऊन समोरच्या पार्टीला चारी मुंड्या चित झाल्याचे आजपर्यंत तालुक्याने पाहिले त्यामुळे अशी भांडणे ही नेहमी अल्पसंख्याक नेत्याच्या पथ्यावर पडतात हे तालुक्याला माहीत आहे असेही नागरिकांतून खुलेआम बोलले जात होते.
वाद फक्त श्रेयवादासाठीच ?
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रस्त्याच्या कामासाठी निधी कोणी आणला या श्रेयवादासाठीच भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते समोरासमोर भिडले त्यामुळे हा वाद फक्त श्रेयवादासाठीच होता असे नागरिकांतून बोलले जात आहे.