आपला जिल्हा

लाचखोरीत पोलीस प्रथम क्रमांकावर तर महसूल दुसऱ्या क्रमांकावर

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

लाचखोरीत पोलीस प्रथम क्रमांकावर तर महसूल दुसऱ्या क्रमांकावर
श्रीगोंदा प्रतिनिधी :- शासकीय कामासाठी लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे मात्र लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही पैसे दिल्यानंतर पटापट कामे होतात परंतु काही जण लाच न देता लाच लुजपत विभागाकडे तक्रार करत असून गेल्या पाच वर्षात विविध विभागातील 188 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे शासकीय कार्यालयात सर्वसामान्य काम घेऊन येतात अर्ज फाटे करूनही दखल घेतली जात नाही काम करून देण्याच्या बदल्यात काही अधिकारी व कर्मचारी लाचेची मागणी करतात अगदी किरकोळ कामासाठी सर्वसामान्यांना पैसे मोजावे लागतात काम करून घेण्यासाठी इच्छा नसतानाही नागरिकांना पैसे द्यावे लागतात काही जण टेबलाखालून लाच देऊन स्वतःचे काम करून घेतात त्याची कुठेही तक्रार होत नाही मात्र काही जण जागरूक असतात ते लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात अशा तक्रारीची दखल घेऊन लाच लुचपत विभागाकडून सापळा लावून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडतात गेल्या पाच वर्षात या विभागाने 188 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली याशिवाय जलयुक्त शिवार अभियानाबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन लाच लुचपत विभागाने चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत गेल्या पाच वर्षात सर्वाधिक पोलीस खात्यातील 45 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याची कारवाई करण्यात आली आहे लाचखोरीत महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून गेल्या पाच वर्षात या विभागाचे 35 अधिकारी व कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने इतर कोणी लाचेची मागणी केल्यास ०२४१-२४२३६७७ अथवा टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर यांनी केले आहे
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!