Uncategorized

रेनबो स्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न…!

मनिष जाधव 9823752964

इ

रेनबो स्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न…!

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, येथे स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी १९४ वी जयंती “बालिका दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी, संस्थेचे सचिव मा. संजयजी नागरे सर, कार्यकारी संचालक मा.आकाशजी नागरे सर, शैक्षणिक संचालक मा.नानासाहेब दवंगे सर, उप प्राचार्य श्री निलेश औताडे सर कार्यालयीन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

अ

सर्वप्रथम, मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योतीला विनम्र अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना समृद्धी माकोणे या विद्यार्थिनीने “मी सावित्री बोलतेय” या एकपात्री नाटिकेतून सावित्रीबाईंचा संघर्षमय जीवनपट उलगडून दाखवत उत्कृष्ट अभिनय केला. तसेच सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेला अखंड ध्यास एका दुसऱ्या नाटिकेतून सादर करताना समीक्षा घुले, आराध्य रोकडे, नमिष दगडे अद्वैत कोळपकर या विद्यार्थ्यांनी देखील उत्कृष्ट सादरीकरण केले.

ज
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमृता मानूरकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून समाज शिक्षित करण्याकरिता केलेल्या महान कार्याचे महत्त्व विशद केले. सावित्रीबाईंच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेताना जी एम पगारे यांनी सांगितले की, सावित्रीबाईंचा निःस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीबाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हीच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उप प्राचार्य श्री निलेश औताडे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतिकारी आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. शिक्षणाखेरीज मनुष्याचा विकास साधणार नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षिता बडजाते व कनिष्का बागुल यांनी केले तर आभार रिधिमा गूळस्कर या विद्यार्थिनीने व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक स्मिता देशमुख, मोनाली सुराळे, याबरोबरच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी यशस्वीपणे पार पाडले. यावेळी, सावित्रीच्या लेकी अर्थात सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष मा. कांतीलालजी अग्रवाल, विश्वस्त मा. मनोजजी अग्रवाल, मा.आनंदजी दगडे, सौ वनिताताई नागरे मॅडम आदि पदाधिकाऱ्यांनी बालिका दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!