महिला शिक्षणाचा महात्मा फुलेंचा निर्णय समाज परिवर्तनात मैलाचा दगड ठरला – पुष्पाताई काळे
कोपरगावमध्ये महात्मा फुलेंची जयंती उत्साहात साजरी
कोळपेवाडी वार्ताहर :- शिक्षणाचा अभाव असल्यामुळे समाजात रूढी, परंपरा जोपासल्या जावून समाजात अज्ञानाचा अंधार पसरला होता. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे होते. जोपर्यंत महिला शिक्षण घेणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यावेळी स्त्री शिक्षणाचा निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे आज महिला शिक्षण घेवून स्वावलंबी तर झाल्या आहेत त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च पदावर देखील महिला विराजमान आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षण देण्याचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय समाज परिवर्तनात मैलाचा दगड ठरला असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव येथे केले.
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सौ. पुष्पाताई काळे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षणामध्ये किती ताकद आहे व शिक्षण काय परिवर्तन घडवू शकते हे महात्मा ज्योतिबा फुले यांना ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेवून महिलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेवून शिक्षणा अभावी समाजात निर्माण झालेला अज्ञानाचा गडद अंधार त्यांनी शिक्षणाच्या प्रकाशातून दूर केला.त्यामुळे आज राजकारण, समाजकारणाबरोबरच महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने दिसत आहे असे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले.
यावेळी पद्माकांत कुदळे, रवीकाका बोरावके, मच्छिंद्र पठाडे, दीलीप बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, विरेन बोरावके, सौ. माधवी वाकचौरे, बापू इनामके, विशाल राऊत, बाळासाहेब पांढरे, बापू वढणे, अनुप गिरमे, प्रदीप नवले, सचिन बोरावके, गिरीश हिवाळे, संजयजी कुदळे, सुमित भोंगळे, प्रकाश रासकर, कैलास जगझाप, वैभव गिरमेप्रभा नवले, वैजयंती बोरावके, कविता बोरावके, काजल गलांडे, स्वप्ना जाधव, पाटील राधिका, संगीता मालकर, संध्या राऊत, सई रासकर छायाताई गिरमे रोहिणी गिरणी, राजश्री गिरमे सोनाली टिळेकर, पुष्पांजली बरोवके, गीतांजली चौकडे, अंजली भोंगळे, संगिता शिवरकर, कावेरी राऊत, मंदाताई रासकर, वर्षा ससाणे, जयश्री बोरावके, उमा गिरमे, मिनल रासकर, अश्विनी गायकवाड, अनिता बोरावके, रूपाली बोरावके, वर्षा आगरकरे, गिताताई रासकर, मनिष जाधव, बाबा नेवगे, राजेंद्र बागुल,सचिन ससाणे, प्रशांत भास्कर,प्रा. संदीप जगझाप, रविंद्र पठाडे, ओंकार वढणे यांच्यासहआदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.