महसूलच्या हलगर्जीपणामुळे शहरातील नुकसान भरपाई रखडली – आकाश नागरे
कोपरगावकरांना फक्त सुचना देणारा लोकप्रतिनिधी नको
काँग्रेस नुकसानग्रस्तांच्या भक्कम पाठीशी ; शासनदरबारी पाठपुरावा सुरू
कोपरगाव प्रतिनिधी – मागील वर्षी कोपरगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले होते. भरपाई ची मागणी होताच नगरपरिषदेने पंचनामे करून एक वर्ष झाले तरीही नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्कम मिळवून देण्यास महसूल विभागाला अपयश आले आहे. यातुन महसूल विभागाची हलगर्जीपणा उघड झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शासनदरबारी पाठपुरावा करुन ६०० पेक्षा अधिक नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देणार असल्याचे काँग्रेसचे कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी सांगितले.
सरकारी काम करायचे म्हणटले की, सर्वांत प्रथम आठवतं “सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण” आठवतेय. परंतु यातुन सर्व सामान्य नागरिकांचे नुकसान होते याकडे कोण लक्ष देणार ? अतिवृष्टीसह इतर कोणताही प्रश्न असो लोकप्रतिनिधी प्रशासनाला सुचना देवून बाजुला होतात परंतु दिलेल्या सूचना पूर्ण केले की नाही हे कोण बघणार, याची जवाबदारी कोणाची? मतदारसंघाला सुचना देणारा लोकप्रतिनिधी नको तर काम करणारा आणि काम करून घेणारा पाहिजे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकी, कर्मवीरनगर यासह अनेक ठिकाणच्या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले पंचनामे होवून एक वर्ष होत आले तरीही नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही. नगरपरिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन पंचनामे करून महसूल विभागाला दिले त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय , पाठपुरावा साठी कोणीच जवाबदारी न घेतल्याने जवळपास ६०० पेक्षा अधिक नुकसानग्रस्तांवर अन्याय झाला आहे. या नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेऊन शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देणार असल्याचे देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिली आहे.