बेकायदेशीर फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का ?
कोपरगाव मनिष जाधव – निवडणुकीचे वातावरण असल्याने सगळीकडे विविध कार्यक्रम होत आहे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी सर्व प्रकारच्या परवानगी घेतली जाते मग शहरात फलक लावण्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे असताना देखील परवानगी न घेता मर्जी प्रमाणे लागेल त्या साईज मध्ये, लागेल त्या ठिकाणी लावलेले आहेत. बेकायदेशीर फलकाचे प्रमाण वाढलेले आहे पालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असताना देखील याकडे दुर्लक्ष केल्याने शहरात जसे काही “बहर” च आले आहे.

कोपरगाव शहर हे आज प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानास्पद आहे. एकप्रकारे शहराला चांगले सौंदर्य आहे. शहरात आल्यावर आता राजकीय बरोबर वाढदिवस शुभेच्छा , श्रध्दांजली, शैक्षणिक प्रवेश, व्यवसाय, निवडणुकीचे इच्छुक उमेदवारांची स्वागत बोर्ड लगलेले दिसतात विशेष म्हणजे रस्त्यावर , चौकात फलक लावण्यासाठी जागा कमी पडल्याने आता फलक चक्क भिंतीवर, पथदिपावर फलकाचे साम्राज्य उभारलेले दिसत आहे. झालेल्या विद्रूपीकरण शहराचे सौंदर्य गायब झाले आहे. शहराच्या सौंदर्याला धक्का पोहचविणाऱ्यांवर कारवाई करा अशी सर्व सामान्य व्यक्ती पासून मागणी केली जात आहे.

नुकतेच सुहास जगताप यांनी मुख्याधिकारी पदभार स्वीकारला असून शहरातील प्रलंबित कामाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. फलका बाबत कोणते धोरण व नियमावली जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. परंतु ज्यांनी ज्यांनी बेकायदेशीर फलक लावले त्यांच्या कडून पालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करून फलक फी पालिका प्रशासनाला वसुल करावी लागणार आहे.