बदलीमध्ये झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत सेवक करणार संस्थेच्या समोर उपोषण आणि मुंडन
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे :- रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालय, महाविद्यालय मधील रयत सेवकांच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याने येत्या ४तारखेला रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी अनेक सेवक उपोषणासह मुंडन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार असल्याची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालय आणि महाविद्यालय मधील रयत सेवकांच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे असे अनेक सेवकांचे म्हणणे आहे ते दिलेल्या निवेदनात म्हणतात की संस्था प्रशासनाने दिनांक ३० आॕगस्ट व ३१ आॕगस्ट २२ रोजी प्रशासकीय बदल्या केलेल्या असून , सदर बदली प्रक्रियेमध्ये अन्याय झालेला आहे. बदलीचे कारण प्रशासनाकडून रिपोर्टेड बदली म्हणून सांगितले जात आहे , ते निवेदनात म्हणतात काही सेवकांच्या बदल्या अगदी दोन – चार वर्षातच , तर काही सेवकांच्या बदल्या या मुख्याध्यापक किंवा कोणाच्यातरी वैयक्तिक आकसापोटी झालेल्या आहेत . अशा प्रकारचे काही रिपोर्ट असल्यास त्याची चौकशी होणे आवश्यक होते. त्यांच्या शाखेमध्ये दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करत असून आमच्यावर कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट अथवा तक्रार आहेत याची आम्हाला कोणतीही कल्पना नाही. आम्ही सर्वजन गैरसोयीने ज्या शाखेत बदलून गेलेलो आहोत त्या शाखेमध्येही रिपोर्टेड बदली म्हणून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुषित आहे. यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. शिवाय आमच्यासोबत झालेल्या काही सेवकांच्या बदल्या , या प्रक्रियेमध्ये रद्द होताना, तसेच सोयीने इतर सोयीच्या शाखेत बदली होताना सुद्धा दिसत आहेत . त्यामुळे व्यक्ती पाहून न्याय दिला जात आहे , हा ही आमच्यावर अन्यायच आहे . विभागीय अधिकारी यांच्याकडे वारंवार याबाबत चौकशी केली असता , उडवाउडवीची व वेळ मारून नेण्याची उत्तरे दिली जात आहेत . आमचा कोणताही वशिला नसल्याने किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याची शिफारस नसल्याने , आमच्या बदल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे . कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजासाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये , या झालेल्या बदली प्रक्रियेत जास्तीत जास्त सेवक हे मागासवर्गीयच आहेत , हा निव्वळ योगायोग समजावा का ? बहुजन समाजातील आम्हा सेवकांना न्याय मिळवण्यासाठी उपोषण अथवा न्यायालयीन लढा , लढावा लागत असेल तर यासारखे अजून काय ? प्रशासकीय बदलीच्या नावाखाली काही सेवकांची गैरसोय , तर वर्षानुवर्षे एकाच शाखेत असलेले सेवक आहे त्याच शाखेत सोयीने आहेत . हा भेदभाव कशासाठी ? सर्वांना समान न्याय मिळणार नाही का ? या प्रशासकीय बदल्यांमध्ये कोणतेही नियम अथवा निकष लावलेले दिसत नाहीत . सन २००८ साली , सन २०२१ साली संस्थेने बनवलेले निकष , त्यामध्ये कोठेही दिसत नाहीत . सदरील बदली प्रक्रियेमध्ये आमच्यावर अन्याय झाला असून आम्हाला यामध्ये न्याय मिळावा म्हणून , रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही दिनांक ३ऑक्टोबर रोजी सोमवार पासून संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणारआहेत . आणि दिनांक ४ऑक्टोबर रोजी संस्थेच्या समोर जाहीर मुंडणाचा इशारा दिला आहे यामध्ये घुगे महावीर वसंत ,भालेराव प्रियंका रघुनाथ , पठाण शायक चाँदखाँ , मरभळ सोमनाथ कावजी, सोलाट किशोर ज्ञानदेव,घोडे पंढरीनाथ सखाराम , जोर्वेकर चंद्रकांत मारुती, गावीत राजू बघू , थावरे प्रशांत पांडुरंग आदी रयत सेवक उपोषणासह मुंडन आंदोलन करणार आहेत या आशयाचे निवेदन त्यांनी राज्यपाल, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री,शिक्षण संचालक पुणे,जिल्हाधिकारी सातारा,पोलीस अधीक्षक सातारा, डॉक्टर अनिल पाटील साहेब , चेअरमन रयत शिक्षण संस्था ,सहसचिव रयत शिक्षण संस्था, पोलीस निरीक्षक सातारा शहर,अध्यक्ष , रयत सेवक मित्र मंडळ सातारा यांच्यासह अनेकांना दिले असून अश्या प्रकारामुळे रयत शिक्षण संस्थेची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.