Uncategorized

नगरपालिका नागरिकांना सोई सुविधा देत नाही आणि दुसरीकडे पट्टी कर विसुलीची सक्ती करते ,हे अन्ययकारक – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

संपादक मनिष जाधव 9823752964

नगरपालिका नागरिकांना सोई सुविधा देत नाही आणि दुसरीकडे पट्टी कर विसुलीची सक्ती करते ,हे अन्ययकारक – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगांव प्रतिनिधी – नागरिक कर भरत नाही हे कोपरगाव नगरपालीकेचे कामाचे अपयश असून ज्या सुविधा देण्यासाठी नागरिक कर भरतात त्या देण्यात नगरपालिका अयशस्वी झाल्यानेच जनता कर भरत नाही. आणि त्यातच शास्ती (व्याज) हे मोठ्या प्रमाणावर लावत आहे/घेत आहे.

च

ङ

जनतेला नगरपालिकेकडून फक्त रोज स्वच्छ पिण्यायोग्य चांगले पाणी , खड्डेरहित चांगले रस्ते ,धूळ रहित गाव , चांगले आरोग्य सुविधा, दर आठवड्याला डासांसाठी औषध फवारणी ,मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त .नागरिकांना आवश्यक असणारे दाखले , बांधकाम परवानगी अगदी पटकन मिळावे . सर्व सोयी युक्त असे शहर करून ,जेणेकरून शहरात रोजगार उपलब्ध होईल व गावाची बाजारपेठ वाढेल , व्यापार वाढेल असे शहर करणे जनतेला अनेक वर्षांपासून अपेक्षित आहे. त्यातल्यात्यात एवढीच मुबलक अपेक्षा फक्त नागरिकांची नगरपालिकेकडून आहे.

च

आजही पाणी आठ दिवसाआड आहे .नगरपालिकेने कॅनॉलचे काम चालू असून त्यामुळे चार दिवसाचे पाणी आठ दिवसाआड केले आणि काही दिवसातच कॅनॉलचे काम झाले की लगेच पाणीपुरवठा चार दिवसाआड करू असे जाहीर केले होते. परंतु आता दीड महिना झाला त्यावर आत्ता दुसऱ्यांदा कॅनलला पाणी येऊन गेले / आले . तरी देखील नगरपालिकेने पाणी दिवस कमी केले नाही . यामुळे नागरिकांमध्ये पालिकेविषयी विश्वासार्थ राहिली नाही .आजही प्यायला अस्वच्छ पाणी येत आहे .नगरपालिका रोज स्वच्छ पाणी देण्याची वार्षिक पट्टी घेते आणि वर्षातून 365 दिवस पाणी देण्या ऐवजी 36 ते 50 दिवस फक्त पाणी देते आणि तेही गढूळ , दुर्गंधी येईपर्यंत अस्वच्छ असे पाणी देते .यामुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरत असून नागरिकांना बोरचे पाणी पिऊन त्रास होत आहे याला जबाबदार कोण.
अजूनही शहरातली धूळ कमी झालेली नाही .त्यामुळे श्वासनाचे आजार ,डोळ्याचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे व नागरिकांना व्यापाऱ्यांना दुकाने सामान स्वच्छ ठेवता ठेवता नाकी नऊ येत आहे. उत्पन्न कमी व स्वच्छतेवरच व्यापाऱ्यांचा खर्च वाढत आहे.

छ
अजूनही गावात बरेचशे रस्ते झालेले नाही आणि जे झाले त्याबद्दल जनतेमध्ये कामे दर्जेदार झाली नाही असे प्रत्यक्ष बघणार यांना दिसत आहे लोक बोलत आहेत. संभाजी महाराज पुतळा इंदिरापथ चे काम हे चांगल्या दर्जाचे झाले नाही ,अर्धवट झाले .पुढे गोकुळ नगरीच्या वळणावर व तिथून पुढचा रस्ता तसाच राहिला व फार .मोठा करणार असं सांगण्यात आले होते टेंडर मध्ये मोठ्या रस्ता होणार असे सर्व आहे असे असताना देखील हा रस्ता छोटा झाला तोही अपूर्ण आहे.मग नगरपालिका प्रशासक काय देखरेख करते.
त्याचबरोबर मार्केट कमिटी पासून कोळपेवाडी पेट्रोल पंपाच्या चौकापासून ते साईबाबा कॉर्नरला जोडणारा शॉर्ट कट रस्ता जो की शाळकरी मुलांसाठी, व्यापाऱ्यांसाठी ,कॉलेजच्या मुलांसाठी खूप सोयीचा आहे .त्याचे टेंडर निघून एक वर्ष झाले .अद्यापही त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
मार्केट कमिटीच्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून धुळीमुळे तेथे चालणे व दुकानदारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून सर्वजण पालिकेला सांगून वैतागून गेले आहेत.त्यात आत्ता रोड खोदून पिण्याची पाइपलाइन टाकली.आजुन रोड खराब झाला व धूळ वाढली.
सोमय्या कॉलेजला जाणारा छोटा पुलानंतरचा रस्ता ते तांडेल बंगला ते भेट नका या रस्त्यावर मोठमोठे घडले पडले असून अद्यापही पालिकेने ते बुजवन्याची साधी तसदी ही घेतली नाही .त्यामुळे कोपरगावात बेट रोडणे गावात येणारे लोक नावे ठेवत आहे व त्रास सहन करत आहे. तसेच शिर्डीला जाणाऱ्या रिक्षा व मोटरसायकल धारक गाडी धारक यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात आपटून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात काम निघत असून नुकसान होत आहे .काय आदर्श नगरपालिका या कॉलेजच्या तरुणांसमोर निकृष्ट कामे करून ठेवत आहे याचा विचार करावा .
बसस्टँड ते खंडकणाला रोड च्या बाजूला डांबरी रोड ला मोठी कपार आहे. त्या ठिकाणी लोक पडत आहे.
सर्व गावात मोठ मोठी स्पीड ब्रेकर करून ठेवली आहे.ती छोटी आकाराची व त्रासदायक नसावी.
कोपरगाव शहरातील सर्वात महत्त्वाचा बँक रोड ,भाजी मार्केट रोड त्याची तर अक्षरशा खड्ड्यांनी चांगली झाली आहे .एवढा महत्त्वाचा रस्ता असून देखील पालिका त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. नगरपालिका नवीन बिल्डिंग ,तहसील कार्यालय यांना खेटून जाणारा धारणगाव रोड ते टिळक नगर ,जुने पोस्ट ऑफिस समोरील रस्ता की जो गांधीनगर च्या रस्त्याला जाऊन मिळतो ,त्याचाही वरचा थर निघून त्या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. टाकळी नाका ते खडकी हा महत्त्वाचा रस्ता याची देखील खूप दैन्य अवस्था झालेली आहे .त्यामुळे सर्वांनाच त्याचा मोठ्या प्रमाणात जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे.
कोपरगाव शहरातील मेन चौकात भर रस्त्यात दोन चेंबर टाकले व कोपरगावातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर रस्ते व परत पाईपलाईन साठी ते रस्ते खोदून रस्ते होते का नव्हते असं खड्डेच खड्डे अशी रस्त्यांची अवस्था करून टाकली आहे. ह्या होणाऱ्या जनतेच्या पैशाची जणू खाय उधळपट्टी चालू आहे असं म्हणावे लागेल.तसेच २८ कामाचा लेखी लेखाजोखा द्यावा.
कोपरगाव शहरात मेन चौकत दुकाने अगदी रस्त्यावर आल्यामुळे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढली जाऊन शाळेत जाणाऱ्या मुलांना तालुक्यातून येणाऱ्या लोकांना सर्वांना त्यामुळे तेथे ट्रॅफिक जाम होऊन मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे .कोपरगाव शहरात कुठेही पार्किंगला नगरपालिकेने जागा ठेवलेली नाही.
सप्तर्षी मळ्यामध्ये बांधलेले चांगले अद्यावत असे बाजार ओटे त्या ठिकाणी भाजीपाला विकणाऱ्यांना बसवण्यात पाठवण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे सोमवारी जो बाजार भरतो किंवा सोमवारचा बाजार हा संपूर्ण रस्त्यांवर भरतो व जे गाळेधारक दुकानदार आहेत त्यांचे त्यामुळे धंदे होत नाही आणि दुसऱ्या दिवशी नगरपालिका वर स्वच्छता करायचा कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो ही नगरपालिकेची मोठी चूक आहे.
कोपरगाव शहरातील दत्तपार, गोदावरी नदी खालील भुयार , राघोबादादा वाडा , बेट भागातील पौराणिक शुक्रेश्वर , कचेश्वर मंदिर परिसर हा विकसित करण्यासाठी नगरपालिकेने सहकार्य केले पाहिजे ,जेणेकरून शिर्डी ला येणारे लोक कोपरगाव ला येतील . त्या मुळे पर्यटन वाढेल गावाची बाजारपेठ वाढेल/ सुधारेल , रोजगार वाढेल.
कोपरगाव शहरात ना मुलांना खेळायला बाग आहे न ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी विरंगुळ्यासाठी जागा आहे ना मुलांना खेळण्यासाठी मोठे ग्राउंड आहे.
मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे खुलेनाट्यगृह कोपरगाव शहरात होते त्याचे देखील एक कोटी रुपये चे टेंडर देऊन अद्याप नगरपालिका त्याचे नूतनीकरण करू शकले नाही .याचा जाब नागरिकांनी विचारला तर त्यांची चूक लपवण्यासाठी नगरपालिकेने ती वास्तू पडायला झाली जीर्ण झाली. यासाठी ऑडिट करायला दिले असून म्हणजे ती बिल्डिंगच नाट्यगृह पाडून टाकायचं ,अशी नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे व चर्चा आहे.
कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात हातावर मोल मजुरी करून लोक राहतात, त्यात गांधीनगर ,संजय नगर ,सुभाष नगर ,खडकी , टाकळी नाका , टिळक नगर , जबरेश्वर मंदिर खालचा भाग , लक्ष्मीनगर , मोहिनीराज नगर , कोर्टरोड परिसर , बैल बाजार रोड , खंडकनाला परिसर ,१०५ अशा अनेक ठिकाणी मध्यमवर्गीय लोक राहतात .हे सर्वजण काबाडकष्ट करून मोलमजुरी करून आपले घरदार चालवतात. नुकताच कोरोना संपला असून आत्ताशी कुठं लोकांचा व्यवसायाचा कामाचा रुटीन बसायला लागली आहे .त्यात नगरपालिकेने कुठल्याही सुविधा न देता साधे पाणी देऊ शकत नाही आणि पट्टी वसूल करण्यात बळजबरी करत आहे .जर नगरपालिकेने या सुविधा दिल्या असत्या तर कोणीच पट्टी कोणत्याच प्रकारे ठेवली नसती .
जवळ जवळ 75 वर्ष होत आले स्वातंत्र्य मिळून आजही कोपरगावकरांना साधी पाणी पिण्याची मिळू शकत नाही याहून कुठलीच मोठी शोकांतिका नाही. ४२ कोटी खर्च होऊनही स्वच्छ पाणी मिळत नाही .याला जबाबदार कोण. तसेच मोठ मोठे निधी येऊन कमी दर्जेदार व पूर्ण होत नसतील तर ?
*नगरपालिका ज्या पद्धतीने पट्टी वसूल करत आहे तिच्याविरुद्ध मानव अधिकार संघटनेकडे तसेच स्वातंत्र्यसैनिक आण्णाजी हजारे यांच्याही कानावर या गोष्टी घालाव्या लागणार आहेत .त्यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे. नगरपालिके विरुद्ध तक्रार करावी लागणार आहे.

तरी नगरपालिकेला विनंती आहे की तुम्हाला शासन मोठा पगार देते त्याबदल्यात तुम्ही आम्हाला या सर्व सुविधा लवकरात लवकर कागदपत्री नव्हे तर प्रत्यक्ष लोकांना दिसतील जनतेला दिसतील अशी दर्जेदार करून करून दिलासा द्यावा व त्यानंतरच हक्काने पट्टी वसूल करावी ही नगरपालिकेला तमाम नागरिकांच्या वतीने विनंती……..

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!