दिवस उजाडला निरोपाचा….!
सोनवणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ संपन्न

अंदरसूल सचिन सोनवणे – अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तर इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ दिनांक ३ फेब्रवारी रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण भांडगे होते . सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या निरोप समारंभा प्रसंगी विद्यार्थी तसेच शिक्षक भाऊक झालेत.

विद्यार्थ्यांनी त्यांचे विद्यालयातील विविध अनुभव सांगत केलेल्या गमती जमती, ही शाळा व शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात. आपले अनुभव व्यक्त करताना विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले तसेच शुभेच्छा हि दिल्यात. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री.देवांग बनकर साहेब, सॉफ्टवेअर इंजिनियर, ICERTIS पुणे व मा.श्री.साईनाथ भाऊसाहेब गाडे साहेब, राज्य विक्रीकर निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच येवला नगरपरिषद येवला, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा अंतर्गत झालेल्या स्पर्धेत पटनाट्य स्पर्धा, चित्रकला व व्हिडिओ लघुपट स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अरुण भांडगे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले. त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेस व महाविद्यालयास प्रत्येकी ५ असे एकूण १० डायस भेट दिले. या विद्यार्थ्यांना सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण भांडगे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, आकाश सोनवणे, सुदाम सोनवणे, रामनाथ एंडाइत, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सचिन बोढरे, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, मयुरी टेके, निर्मला शिकारे, दिपाली सोनवणे, गोकुळ वाणी, मयूर भागवत, सुनील भागवत, संदिप बोढरे, सत्यजित गायकवाड, जितेश व्यवहारे, सुवर्णा म्हस्के, पूजा वडाळकर, आरती जगधने, संतोष जाधव, महेश मेहत्रे, आरती भागवत, रेणुका भागवत, सुषमा सोनवणे, कांचन गायकवाड, आरती गोरे, शिवप्रसाद शिरसाठ, रामदास गायके आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी आयुष्यात वेळेचे नियोजन करावे व त्या प्रमाणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी त्यातून आपल्या आई वडिलांचे, गुरूंचे नाव उच्च स्थरावर पोहचवून एक यशस्वी व आदर्श असे व्यक्तिमत्व घडवा –देवांग बनकर साहेब, सॉफ्टवेअर इंजिनियर, ICERTIS पुणे
आयुष्यात असे कुठलेच काम नाही किंवा ध्येय नाही जे आपण पूर्ण करू शकत नाही जिद्दीने कुठलेहि काम करण्यासलागा ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका मग बघा यश लोटांगण घेत तुमच्या पायाजवळ येईल -साईनाथ भाऊसाहेब गाडे साहेब, राज्य विक्रीकर निरीक्षक