तालुक्यातील आमदाराच्या कारभराने जनता दिशाहीन – अनुराधा नागवडे
श्रीगोंदा प्रतिनिधी दादा सोनवणे – जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की तालुक्याचे आमदार अनुभवी आहेत पण जनतेच्या विकासासाठी ते भूमिकेत दिसत नाही त्यामुळे ते कार्यशील वाटत नाहीत त्यामुळे जनता दिशाहीन झाली आहे असे त्यांनी सांगितले.

आज दि १९ रोजी सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याच्या अतिथी गृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अहमदनगर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अनुराधा नागवडे म्हणाल्या की तालुक्याला लाभलेले आमदार अनुभवी आहेत अनुभवी आमदार असताना ते कोणत्याही भूमिकेत दिसत नसल्याने व कुठेही कार्यशील दिसत नाहीत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे ते कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नसल्यामुळे तालुका दिशाहीन होऊन पोरका झाला आहे असेही त्यांनी राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता बोलले आहेत त्या पुढे बोलताना म्हणाल्या की तालुक्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे सध्या झालेला पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील मूग,उडीद,तूर,मका,अशी अनेक पिके खराब झाली आहेत त्याचे काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत पण आता पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच यामुळे जनावरांचा चारा संपुष्टात आला असून पशुधन अडचणीत आहे त्यात लंपी आजारामुळे जनावरे दगावत आहेत त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे आज शेतकऱ्यांच्या वखारीमधील कांदा सडत आहे तसेच नवीन लावलेला ऊस उगवलाच नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होऊन संकटात सापडला आहे त्यामुळे चालू वर्षी शेतकरी अंधारात असताना आम्ही नागवडे कुटुंबातील सर्व जण दिवाळी साजरी करणार नाही असेही त्यांनी सांगितले तरी सर्व प्रश्नासाठी दोन दिवसात मुख्यमंत्री यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून शेतकऱ्यांना कमीतकमी एकरी ७५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करणार आहे असेही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेस आदेश नागवडे, आप्पासाहेब काकडे,योगेश भोईटे, प्रशांत दरेकर , आदी मान्यवर उपस्थित होते