Uncategorized

कोपरगावसह राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार – आकाश नागरे ; संवाद यात्राची तयारी अंतिम टप्प्यात

मनिष जाधव 9823752964

संवाद

कोपरगावसह राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार – आकाश नागरे
संवाद यात्राची तयारी अंतिम टप्प्यात

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मळाला. केरळ ते जम्मू काश्मीर पर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने सोमवारी दिनांक ११ सप्टेंबर रोजी कोपरगाव येथे जनसंवाद पदयात्रा होणार असुन “यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची” असा गजर करत काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत यात मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असुन कोपरगावसह राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष आकाश नागरे बोलत होते.

अ

आकाश “यात्रा संवादाची, बांधिलकी लोक भावनेची” या माध्यमातून होणाऱ्या जनसंवाद यात्रा ची माहिती व उद्दिष्टे समजून सांगितल्या नंतर शेतकरी बोलताना म्हणाले की, आम्हाला कर्जमाफी किंवा सरकारकडे हात पसरण्याची गरजच नाही. आमच्या शेतमालाला हमीभाव मिळायला हवा. मात्र, भावाअभावी कापूस घरात पडून असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांनी गावातच पत राहिली नाही. किराणा दुकानदार, कृषी केंद्रचालकांची उधारी थकीत आहे. उच्च शिक्षित तरुण बेरोजगार असल्याने शेतमजुरीचे काम करत आहेत.

गावागावात केंद्रातील मोदी व राज्यातील तीन पक्षांच्या सरकारविरुध्द रोष आहे. भाजपला मतदान करुन दोन वेळेस चूक झाली. तिसऱ्यांदा चूक करणार नाही. तसे केले तर भावी पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत, असे परखड मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

जाहिरात

आकाश नागरे माहिती देताना काँग्रेसचे उद्दिष्टे सांगताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील ‘रयतेचे राज्य व फुले, शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्टाचे पुरोगामित्व अबाधित ठेवणे, शांतता ठेवणे. संविधान टिकवणे आणि सामाजिक ऐक्य कायम राखणे. जाती-धर्मात द्वेष व फुट पाडण्याचे पडयंत्र मोडून काढून ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ हा प्रेमाचा संदेश घरोघरी पोहचवणे. महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे. बेरोजगारी विरोधात आवाज उठवणे कोपरगाव तालुक्याने पहिल्यापासून काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे यापुढेही अशीच साथ आपण द्यायला हवी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून प्रत्येकाशी जन संवाद साधला तेव्हाच लक्षात आले की आता परिवर्तन आटळ आहे त्यामुळे कोपरगाव तील प्रत्येक नागरिकांनी परिवर्तनाचे साक्षीदार व्हावा असे आव्हान यावेळी कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाश नागरे यांनी केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!