Uncategorized

एक मुखाने निर्धार कोपरगाव अव्वल बनविण्याचा विविध मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न 

संपादक मनिष जाधव 9823752964

E

एक मुखाने निर्धार कोपरगाव अव्वल बनविण्याचा विविध मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न 

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –
कोपरगावचे नावलौकिक करणारे प्रसिद्ध आयुर्वेद गुरू व भारत सरकार पुरस्कार प्राप्त डॉ.रामदास आव्हाड,जलतरणपटू डॉ.सुषमा आचारी,जैन धर्म ग्रंथ अभ्यासक व अनुवादक डॉ.अभय दगडे,पीपल्स बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी,दि मर्चंट असोसीएशन चेअरमन अतुल काले,व्हा.चेअरमन राजेशजी ठोळे आदींचा नागरी सत्कार मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार संपन्न झाला.
1
सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या.कायमच सर्वांचे योगदान आपल्याला लागणार आहे.कुणा एका व्यक्तीने विकास होत नाही त्यासाठी सहकार्य आवश्यक असणार आहे.ज्या मान्यवरांचा सत्कार होतोय ते आपल्या गावची अस्मिता आहेत.अनेकांचे योगदान कोपरगावच्या जडणघडणीत आहे.स्व.कोल्हे साहेब,स्व.काळे साहेब,स्व.वहाडणे पाटील,स्व.विखे पाटील,फरांदे सर,स्व.बडदे अशा मान्यवरांच्या पश्चात टीकात्मक चर्चा करून नाही तर त्यांनी सामंजस्याचा मार्ग दाखवला होता हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या बस स्थानक,नगरपालिका,पंचायत समिती,फायर स्टेशन,बाजार ओटे,वाचनालय,पोलीस स्टेशन,विवीध रस्ते,अनेक विकास कामे मला करता आली याचा आनंद आहे.शहरात हद्दवाढ भागाचा समावेश करता आला याचे समाधान आहे.बंदिस्त नाट्यगृहाचे स्वप्न अद्याप बाकी आहे.स्व.कोल्हे साहेब आणि मा. बिपीनदादा यांचे आम्हाला गोर गरीबासाठी धाऊन जाण्याचे संस्कार आहे.
2
कोपरगाव हे स्वाभिमानी आहे त्याला राजकीय अड्डा करून आपली बाजारपेठ कुणालाही आपण खराब करू देणार नाही.आपल्याला सत्ता पदे या पेक्षा नागरिक महत्वाचे आहे हे आपण मानतो.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्याला पाठबळ आहे.कधीही हाक द्या काम करणे हा आपला स्वभाव आहे त्यामुळे कोपरगावच्या विकासात आणि नावलौकिकात भर टाकणारे अनेकांनी भविष्यात आपल्या गावाचे नाव महाराष्ट्रात अभिमानाने घेतले जाईल याची सुरुवात केली आहे.
सत्कार मूर्ती हे आपल्या गावचे भूषण आहे.आपला देश सक्षमपणे पुढें जातोय.उत्तम नेतृत्व लाभले आहे.आपल्या कोपरगाव मद्ये काहीही कमी नाही मात्र त्याचा विनियोग आपल्याला सर्वांना मिळून करावा लागेल.संजीवनी उद्योग समूह शिक्षण संस्था,औद्यीगिक वसाहत,गोदावरी दूध संघ,कॉल सेंटर,रयत शिक्षण संस्था,व्हीएसआय असे विविध ठिकाणी रोजगार आणि संधी उपलब्ध झाल्या.विविध क्षेत्रातील मान्यवरांचे योगदान आपल्या गावच्या विकासात आहे.आपल्याकडे विविध क्षमता आहेत मात्र त्या एकीचे बळ ठेऊन वापराव्या लागतील.सौ.स्नेहलताताई कोल्हे या महिला मंडळातून विधिमंडळात गेल्या हे आपल्या सर्वांमुळे शक्य झाले.सर्वांची एकी हीच आपली ताकद आहे.आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी आहेत त्यांनाही सोबत घेऊन आपली बाजारपेठ अधिक गतिमान करण्यासाठी तयार आहोत.विविध संकल्प माझेही आहेत त्यासाठी नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लागणार आहे.हंगाम खडा करना मेरा मकसत नहीं, इरादा हैं अपने कोपरगावची सुुरत बदलनी चाहिए असा विचार विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.
W
डॉ.रामदास आव्हाड यांनी आपल्या जीवनात आयुर्वेद क्षेत्रात कसे पदार्पण झाले याबद्दल भावना व्यक्त केल्या.आपल्या माणसांनी आपल्या घरात केलेला हा सन्मान आयुष्यात मिळालेल्या सर्व पुरस्कारांबद्दल कौतुकाची थाप आहे.मला रुग्णांनी बरच काही शिकवले आणि अनुभवातून मी आयुर्वेद क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकलो.साईबाबांच्या आशीर्वादाने मी इथवर आलो.अनेक संकटे आली पण ईश्वरीय ऊर्जेने मला त्यातून तारले.सेवा हे प्राधान्य देऊन पैसा हा दुय्यम मानून पेशा स्वीकारला.स्व.शंकरराव कोल्हे साहेबांनी मला कायमच प्रोत्साहन दिले.
डॉ.अभय दगडे यांनी प्राचीन पवित्र जैन धर्म लब्धीसार अनुवादित करताना आलेले अनुभव आणि अध्यात्माची ताकद विशद केली.डॉ.विलास आचारी यांनी डॉ.सुषमा आचारी यांनी आपला जलतरण आणि धावण्याचा सराव करून अंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरत सुवर्ण पदके जिंकली याचा प्रवास मांडला.अतुल काले,राजेंद्र शिंगी यांचे कौतुक या प्रसंगी झाले.राजेश ठोळे यांनी आपल्याला कोपरगावला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.शिर्डी, कोपरगाव,येवला या माध्यमातून स्काय संकल्पना विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडून आपल्या कोपरगावचे व्हिजन मांडले आहे त्यास पाठबळ देऊ असे ठोळे म्हणाले.
स्व.शंकरराव कोल्हे यांची माझा नागरी सन्मान व्हावा अशी इच्छा होती दुर्दैवाने साहेब आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या लाडक्या नातवाने विवेकभैय्या कोल्हे यांनी माझा नागरी सन्मान केला ही माझ्यासाठी अविस्मरणीय बाब आहे – डॉ.रामदास आव्हाड
विवेकभैय्या कोल्हे यांचे स्काय व्हिजन अतिशय प्रभावी असून आगामी काळात हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लाऊन काम करण्यासाठी तयार आहोत असे प्रसिध्द उद्योजक राजेश ठोळे यांनी मत व्यक्त केले.
या प्रसंगी अध्यात्मिक,वैद्यकीय,सामाजिक,व्यापारी, उद्योग, बांधकाम, सुवर्णकार, मेडिकल, कला, क्रीडा, साहित्य, विविध संघटना, संस्था, आजी माजी पदाधिकारी आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!