आपला जिल्हा

अनुग्रह आणि सदगुरु नाम

संपादक मनिष जाधव 9823752964

अनुग्रह आणि सदगुरु नामअनुग्रह आणि सदगुरु नाम

भाग क्र. १०
याच अनुग्रहप्राप्त जिवाकडून ज्यावेळी आत्मज्ञानी सदगुरु भगवंत नामच अमृत पाजतात, त्यावेळी मात्र अशा जीवाच्या भाग्याला अंतच राहत नाही. कारणं गुरुमंत्र ही जिवाची खरी ओळख आम्हाला त्याचवेळी कळते आणि मिळते, ज्यावेळी आम्ही अनुग्रला प्राप्त करतो आणि स्वतःला जाणून घेण्यास तयार होतो. सदगुरु भगवंतांचे स्वरूप त्यांच्या नामारुपाने आमच्या अवतीभवती आणि आतमध्ये सुद्धा स्थित होऊन राहते. अशा प्रकारे स्तिथ होण्यासाठी आम्हाला सदगुरु समर्थांचा सहवास, त्यांचा अनुग्रह, त्यांनी दिलेलं गुरुणाम या सगळ्या गोष्टींची आपल्याला सांगड घालावी लागते. अशी सांगड घळणे म्हणजेच, सदगुरुंनी सांगितलेल्या उपदेशाचे, आदेशांचे, त्यांच्या चारित्र्याचे पालन करणे.
सदगुरु नामाचे नित्य निरंतर नामस्मरण करणे म्हणजे, एक प्रकारे आम्ही आमच्या जिवनात केलेली आध्यात्माची बचत असते. म्हणजे बघा की आमच्या संसारातील प्रत्येक कृतीच्या मुळाशी या बचतीचा फार मोठा वाटा असतो. जे कार्य आम्ही शुद्ध हेतूने करत असू तर, याच बचतीचा त्या ठिकाणी पुरेपूर उपयोग होतो. परिणामी मिळणारा प्रतिसाद अथवा परिणाम हा सकारात्मक मिळतो. आपण ज्यावेळी अनुग्रहीत होतो त्यावेळी निश्चितच आमच्याकडून सकारात्मकच कार्य घडते. कारण या अनुग्रह आणि नामाच्या साहाय्याने आमच्यातील नकारात्मकता हळूहळू कमी होत जाऊन, त्या ठिकाणी सकारात्मकता साकारली जाते. यामुळे संसारात राहून देखील जिवाला आपल्या मुळ स्वरूपाची, मुळ अस्तित्वाची ओळख व्हायला वेळ लागत नाही.
सदगुरु नामाच्या आधारानेच जीवनाचे अंतिम सत्य आत्मा आणि मृत्यू याची उकल करता येते. तीर्थ क्षेत्रे, देव देऊळे, या सर्व ठिकाणचे देवत्व जाणून घ्यायचे असेल तर, आधी सद्गुरू नाम अंगीकारले पाहिजे. कारणं समर्थ सदगुरु म्हणतात जोपर्यंत आमची आम्हाला ओळख होणार नाही, तोपर्यंत देव्हऱ्यातील आणि देवळातील देवाची ओळख कधीच होणार नाही. पिंड आणि ब्रम्हांडाची ओळख सुद्धा या अनुग्रह आणि  सदगुरु नामाच्या आधारानेच होणार आहे. “मी” कोण आहे याचे प्रत्यंतर देखील याच देहात होणार आहे, पण सदगुरु अनुग्रह आणि नामाशिवाय ते देखील शक्य नाही. मी शुध्द चैतन्य स्वरूप आत्मा आहे आणि या देहापासून माझे अस्तित्व वेगळे आहे, असा स्वानुभव देखील सदगुरुंच्या  नाम आणि अनुग्रहानेच प्राप्त होणार आहे. आतापर्यंत आम्ही ज्या देहाला माझं म्हणत होतो, तो देह माझ्या मुळ अस्तित्वाला जागृत करण्यासाठी भगवंताने दिलेलं साधन आहे. वेळीच ही ओळख झाली नाही तर, पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून या जिवाला कुणी वाचवणारा नाही.
          सदगुरु  समर्थांचे स्वरूप देहाने अथवा निर्गुणपणे आमच्यात स्थित आहेत, याचा प्रत्यय केवळ त्यांच्या नामानेच मिळणारा आहे. प्रभू रामांच्या नावाने पाषाण तरले, मगं आपण तर चालते बोलते मनुष्य प्राणी आहोत. आपण का नाही तरणार? निश्चितच तरणार पण त्यासाठी आम्हाला देखील काहीतरी द्यावेच लागेल, काहीतरी क्रियाप्रक्रिया, काहीतरी घ्यावे लागेल. हे सगळं केवळ एका शक्तिसमोर करणे शक्य आहे आणि ती शक्ती म्हणजे प्रत्यक्ष परब्रम्ह सद्गुरू भगवंत! त्यांच्या चरणी देहाभावाने स्वतःला अर्पण व्हावे लागेल. त्यांच्या अनुग्रह नित्य निरंतर राहावे लागेल. त्यांनी दिलेल्या नामाचे स्मरण नित्य निरंतर जिवाला आपल्यात मुरवावे लागेल. आमच्यातील सकळ विषय विकारांचा त्याग करावा लागेल. सदगुरुंना दुसरं काही लागत नाही, त्यांना फक्त तुमचे विकराच चरणी अर्पण करणे अपेक्षित असते. एकदा आमच्यातील “मी”चा अहंकार अर्पण झाल्यावर, मग या देहाचा मालक आमच्यात सदगुरु स्वरूपात प्रकट होतो. म्हणजे या देहाला देवत्वाचा स्वानुभव येतो. तुकाराम महाराज सांगतात, “देव पहवायासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो” म्हणजे आमच्या संतांनी किती वर्षांपुरवीच सांगून ठेवले आहे. तरी देखील आज पण आम्हाला तोच संदेश सांगायची वेळ येते, म्हणजे आमच्या बाबतीत किती मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
        अनुग्रह आणि सदगुरु  नाम या दोन गोष्टींवर जर आम्ही विचारपूर्वक चिंतन केले तर, पुढील आध्यात्माची वाट अधिक सुरळीत आणि सुकर निश्चित होईल. कारणं या दोन संकल्पना पुढच्या पायऱ्यांचा आधार अथवा पाया म्हणावा लागेल. त्यासाठी आम्हाला आधी हा पाया मजबूत आणि कणखर ठेवावा लागेल. कारणं एखादी इमारत ही किती उंच जाईल हे तिच्या पायावरच अवलंबून असते. जितका पाया मजबूत तितकं त्या इमारतीचं शेवटपर्यंतच बांधकाम टिकणारे असते. म्हणून अनुग्रह आणि सद्गुरू नाम हे अतिशय महत्त्वाचे दोन दुवे, आम्ही सदगुरु  चारणाबरोबर आचरणात आणणे अनिवार्य आहे; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आपला आत्मचिंतक 
आत्मा मालिक
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!